शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी; पावसाने नसल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 21:20 IST

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत....

भिगवण (पुणे) :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी पाळी न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी ७ दिवसांच्या आत बंद झाल्यामुळे ते शेताच्या ओठावरच नीट पोहोचू शकले नाही तर ते पोटाला कसे मिळणार याचा विचार पाटबंधारे विभागाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच खडकवासलातूनइंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी पूर आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, नेहमी पर्जन्यमान कमी असणाऱ्या इंदापूर तालुक्याला पावसाच्या रुसव्याप्रमाणेच प्रशासनाच्या फसव्या धोरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतेक तलाव आटून गेले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या धाराही बंद झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत नीचांकी पावसाची नोंद ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य पिके वाचली नाहीत तर अगदी चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच तलावासाठी संजीवनी ठरणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्यातील तलाव भरण्याचे कोणतेही धोरण राबविले जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

भिगवण ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार जूनमध्ये २९.६ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात ६२.६ मिलीमीटर पाऊस पडला असल्याची माहिती आहे. ही गेल्या २५ वर्षांत २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पावसाची नोंद घेण्यात आल्याचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देवीदास फलफले यांनी दिली. खडकवासला धरण साखळीत पुरेसा साठा असताना इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे. यातून शेतकरी चारा पीक घेऊ शकतो. मात्र, मान्सून संपून चालला असताना इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे असताना दोन्ही बाजूंचे राजकीय नेते गप्प आहेत, हे योग्य नाही.

नेहमी शेतकऱ्यांसाठी इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदार तालुका पाणीदार व्हावा यासाठी झगडत असतात. मात्र, पावसाळा संपून चालला असताना तलाव भरण्यासाठी राजकीय भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मागील १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, मागणी करताच शेतीसाठी सुरू असलेली पाळी ७ दिवसांत बंद करण्यात आली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

- तुकाराम बंडगर, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाIndapurइंदापूर