शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी; पावसाने नसल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 21:20 IST

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत....

भिगवण (पुणे) :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी पाळी न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी ७ दिवसांच्या आत बंद झाल्यामुळे ते शेताच्या ओठावरच नीट पोहोचू शकले नाही तर ते पोटाला कसे मिळणार याचा विचार पाटबंधारे विभागाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच खडकवासलातूनइंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी पूर आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, नेहमी पर्जन्यमान कमी असणाऱ्या इंदापूर तालुक्याला पावसाच्या रुसव्याप्रमाणेच प्रशासनाच्या फसव्या धोरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतेक तलाव आटून गेले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या धाराही बंद झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत नीचांकी पावसाची नोंद ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य पिके वाचली नाहीत तर अगदी चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच तलावासाठी संजीवनी ठरणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्यातील तलाव भरण्याचे कोणतेही धोरण राबविले जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

भिगवण ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार जूनमध्ये २९.६ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात ६२.६ मिलीमीटर पाऊस पडला असल्याची माहिती आहे. ही गेल्या २५ वर्षांत २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पावसाची नोंद घेण्यात आल्याचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देवीदास फलफले यांनी दिली. खडकवासला धरण साखळीत पुरेसा साठा असताना इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे. यातून शेतकरी चारा पीक घेऊ शकतो. मात्र, मान्सून संपून चालला असताना इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे असताना दोन्ही बाजूंचे राजकीय नेते गप्प आहेत, हे योग्य नाही.

नेहमी शेतकऱ्यांसाठी इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदार तालुका पाणीदार व्हावा यासाठी झगडत असतात. मात्र, पावसाळा संपून चालला असताना तलाव भरण्यासाठी राजकीय भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मागील १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, मागणी करताच शेतीसाठी सुरू असलेली पाळी ७ दिवसांत बंद करण्यात आली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

- तुकाराम बंडगर, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाIndapurइंदापूर