शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी; पावसाने नसल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 21:20 IST

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत....

भिगवण (पुणे) :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी पाळी न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी ७ दिवसांच्या आत बंद झाल्यामुळे ते शेताच्या ओठावरच नीट पोहोचू शकले नाही तर ते पोटाला कसे मिळणार याचा विचार पाटबंधारे विभागाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच खडकवासलातूनइंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी पूर आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, नेहमी पर्जन्यमान कमी असणाऱ्या इंदापूर तालुक्याला पावसाच्या रुसव्याप्रमाणेच प्रशासनाच्या फसव्या धोरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतेक तलाव आटून गेले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या धाराही बंद झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत नीचांकी पावसाची नोंद ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य पिके वाचली नाहीत तर अगदी चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच तलावासाठी संजीवनी ठरणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्यातील तलाव भरण्याचे कोणतेही धोरण राबविले जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

भिगवण ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार जूनमध्ये २९.६ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात ६२.६ मिलीमीटर पाऊस पडला असल्याची माहिती आहे. ही गेल्या २५ वर्षांत २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पावसाची नोंद घेण्यात आल्याचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देवीदास फलफले यांनी दिली. खडकवासला धरण साखळीत पुरेसा साठा असताना इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे. यातून शेतकरी चारा पीक घेऊ शकतो. मात्र, मान्सून संपून चालला असताना इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे असताना दोन्ही बाजूंचे राजकीय नेते गप्प आहेत, हे योग्य नाही.

नेहमी शेतकऱ्यांसाठी इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदार तालुका पाणीदार व्हावा यासाठी झगडत असतात. मात्र, पावसाळा संपून चालला असताना तलाव भरण्यासाठी राजकीय भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मागील १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, मागणी करताच शेतीसाठी सुरू असलेली पाळी ७ दिवसांत बंद करण्यात आली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

- तुकाराम बंडगर, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाIndapurइंदापूर