शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी; पावसाने नसल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 21:20 IST

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत....

भिगवण (पुणे) :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी पाळी न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी ७ दिवसांच्या आत बंद झाल्यामुळे ते शेताच्या ओठावरच नीट पोहोचू शकले नाही तर ते पोटाला कसे मिळणार याचा विचार पाटबंधारे विभागाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच खडकवासलातूनइंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी पूर आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, नेहमी पर्जन्यमान कमी असणाऱ्या इंदापूर तालुक्याला पावसाच्या रुसव्याप्रमाणेच प्रशासनाच्या फसव्या धोरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतेक तलाव आटून गेले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या धाराही बंद झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत नीचांकी पावसाची नोंद ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य पिके वाचली नाहीत तर अगदी चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच तलावासाठी संजीवनी ठरणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्यातील तलाव भरण्याचे कोणतेही धोरण राबविले जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

भिगवण ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार जूनमध्ये २९.६ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात ६२.६ मिलीमीटर पाऊस पडला असल्याची माहिती आहे. ही गेल्या २५ वर्षांत २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पावसाची नोंद घेण्यात आल्याचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देवीदास फलफले यांनी दिली. खडकवासला धरण साखळीत पुरेसा साठा असताना इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे. यातून शेतकरी चारा पीक घेऊ शकतो. मात्र, मान्सून संपून चालला असताना इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे असताना दोन्ही बाजूंचे राजकीय नेते गप्प आहेत, हे योग्य नाही.

नेहमी शेतकऱ्यांसाठी इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदार तालुका पाणीदार व्हावा यासाठी झगडत असतात. मात्र, पावसाळा संपून चालला असताना तलाव भरण्यासाठी राजकीय भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मागील १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, मागणी करताच शेतीसाठी सुरू असलेली पाळी ७ दिवसांत बंद करण्यात आली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

- तुकाराम बंडगर, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाIndapurइंदापूर