शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीविरोधी मोदी सरकार हटवा, साहित्यिक, विचारवंतांचे जनतेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:19 IST

उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सरकारकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, अखलाकची हत्या अशा घटना संविधानाला आणि लोकशाहीला मारक आहेत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसध्याचे सरकार संविधानाच्या मूल्यांशी विसंगत वर्तनधर्मांधता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच यामुळे भारतीय नागरिक व्यथित

पुणे : धर्मनिरपेक्ष देश असे बिरुद मिरवणा-या भारतात गेल्या काही वर्षांमध्ये संविधानाला आणि लोकशाहीला मारक अशा घटना घडत आहेत. देशाची मूल्यव्यवस्था धोक्यात आली आहे. अखलाकची हत्या असो, की कठुआतील सामूहिक बलात्कार, अशा उद्विग्न घटनांनी नागरिक व्यथित झाले आहेत. समाजात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण केली जात आहे. जबाबदार नागरिक म्हणून लोकशाही आणि संविधानातील मूल्यव्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर लोकशाही-विरोधी मोदी सरकारला  सत्तेवरुन पायउतार करा, असे आवाहन राज्यातील विचारवंत, साहित्यिकांतर्फे जनतेला करण्यात आले आहे.   या साहित्यकांमध्ये कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, किशोर बेडकीहाळ, प्रज्ञा दया पवार, तुषार गांधी, लोकेश शेवडे, विजय दिवाण, यांसारख्या साहित्यिक, विचारवंतांचा समावेश असून त्यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.लोकशाही ज्या संस्थांच्या पायावर उभी असते, त्यांचे अवमूल्यन, सरकार-पुरस्कृत धर्मांधता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच यामुळे भारतीय नागरिक व्यथित आहेत. मागील चार वर्षात धक्कादायक घटना घडत आहेत. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशमधील दादरी येथे अखलाक नावाच्या एका मुस्लिमाचा गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन खून झाला. गोरक्षक म्हणविणा-यांनी देशात धुडगूस घातला. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी सुरु झाली. उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सरकारकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, विरोधकांवर हीन पातळीवर उतरुन केली जाणारी टिका, या सर्व घटना उद्विग्न करणा-या आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.भारतीय लोकशाही टिकून रहावी, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर भारत टिकून रहावा आणि संविधानाला धक्का पोहोचू नये, असे वाटत असेलत तर देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकशाहीनिष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका आता घ्यायला हवी, असे आवाहन पत्रकाद्वारे जनतेला करण्यात आले आहे.प्रज्ञा दया पवार, कुमार सप्तर्षी, राज कुलकर्णी, लोकेश शेवडे, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. विवेक कोरडे, सुनील वालावलकर, विजय दिवाण, राजन अन्वर, आशुतोष शिर्के,  डॉ. दिलीप खताळे,  किशोर बेडकीहाळ, सुरेश भुसारी, भारती शर्मा आणि डॉ. मंदार काळे या सर्वांनी मिळून हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.-----------सध्याचे सरकार संविधानाच्या मूल्यांशी विसंगत वर्तन करत आहे. लोकशाहीला आणि संविधानाला मारक परिस्थिती निर्माण झाली आहे. मूल्यांना सुरुंग लावला जात आहे. यामुळे देशाचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.आजकाल लोक व्यवस्थेच्या विरोधात बोलायलाही घाबरतात. साहित्यिकांनी यापूर्वी पुरस्कार वापसीतून निषेध नोंदवला. चिंताजनक वातावरण तयार होत असताना आता सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची, हे अध:पतन रोखण्याची गरज आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून साहित्यिक, विचारवंतांमध्ये याबाबर चर्चा सुरु होती. सर्वसंमतीने, डॉ. विवेक कोरडे यांच्या पुढाकाराने जनतेला पत्रकातून आवाहन करण्यात आले आहे.- अन्वर राजन

टॅग्स :PuneपुणेKumar Saptarshiकुमार सप्तर्षीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा