शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

वटवाघळांना संरक्षण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:18 IST

वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.

बारामती : वटवाघळांना संरक्षण महत्त्वाचे आहे; मात्र १९७२च्या वन्यजीव कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.डॉ. गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की भारतात १२३ प्रजातींची वटवाघळे सापडतात. मात्र, त्यातील फक्त २ जातींना वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले आहे. या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्तअनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकºयांचे नुकसान होत आहे. याची नुकसानभरपाई मिळत नाही, कारण वटवाघळांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याच्या जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते. यात बागांना संरक्षण करण्यासाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे शिवाय अनेक प्रकारचे पक्षी मरत आहेत. यात फाल्कन, तितर, सातभाई, घुबड असे विविध पक्षी मरत असतात.कोकण, सह्याद्री भागात तर वटवाघळांचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पाहावयास मिळते. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. कारण हे पक्षी कुरतडणाºया प्राण्यांच्या गटात पूर्वीपासून समाविष्ट आहेत. शेड्युल ५ मध्ये यांचा समावेश असल्यामुळे यांना संरक्षण नाही ही विशेष बाब. या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. मात्र अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांमध्ये असल्याचे मागणीवरून दिसून येते. अनेक कारखान्यांमध्ये विचारले असता, शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात असे सांगितले जाते. आदिवासी मात्र या तेलाचा वापर कधीच करत नाहीत. मात्र, वटवाघूळ मारून आणून देतात, ते तेल बनविण्यासाठी.परदेशात मात्र वटवाघळांना १०० टक्के संरक्षण दिले आहे. भारतात वटवाघळांना संरक्षण देणे काळानुसार गरजेचे आहे. कारण इतर वन्यजीवांना जसे संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले जाते, झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे होतात आणि शेतकºयांना भरपाई मिळते. शेतकरी आणि वटवाघूळ हा विषय अलीकडच्या काळात गंभीर होत आहे. बहुतांश भागातील शेतकरी आणि वटवाघूळ संघर्ष वाढत असून, यात अनेक ठिकाणी वटवाघळे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.फलाहारी वटवाघळे करतात नुकसानसध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान काही फलाहारी वटवाघळे करीत आहेत. वटवाघूळ आपल्या वन्यजीव कायद्यानुसार मात्र यांना संरक्षण नाही त्यामुळे वन विभाग याबद्दल अजिबात सरकारी मदत देत नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.अनेक शेतकºयांचे याबाबत प्रबोधन केले. मात्र, बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्याची भरपाई शासन देत नसल्यामुळे पुढील काळातदेखील या वन्यजीवांचे प्राण जाणार यात शंकाच नाही. वन विभाग म्हणजे फक्त पर्यटन आणि जंगल विकणे यासाठीच तयार केला आहे का? या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.निसर्ग अन्नसाखळीत प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असून, वटवाघळ तर रात्रभर किटकांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात. तसेच फलाहारी वटवाघळ रात्रभर झाडांची पिकलेली फळे खाऊन बीज प्रसारण आणि बीजारोपण करण्याचे काम दररोज करीत असतात.मात्र १२३ पैकी फक्त ३ प्रजाती पिकलेल्या फळांच्या वासाने अशा बागांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यभर दिसून येत आहेत. मात्र,याविषयी कोठेही संशोधन केले जात नाही, किंवा शेतकºयाला मदत मिळत नाही, ही बाब वाईट आहे.सरकारने वटवाघळासारख्या अतिमहत्त्वाच्या सस्तन प्राण्याला लवकरात लवकर संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच याबाबत सरकारला काही अडचणी असतील तर यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर वन्यजीव कायद्याने संरक्षण देण्यात यावे.

टॅग्स :PuneपुणेNatureनिसर्ग