शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघळांना संरक्षण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:18 IST

वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.

बारामती : वटवाघळांना संरक्षण महत्त्वाचे आहे; मात्र १९७२च्या वन्यजीव कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.डॉ. गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की भारतात १२३ प्रजातींची वटवाघळे सापडतात. मात्र, त्यातील फक्त २ जातींना वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले आहे. या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्तअनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकºयांचे नुकसान होत आहे. याची नुकसानभरपाई मिळत नाही, कारण वटवाघळांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याच्या जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते. यात बागांना संरक्षण करण्यासाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे शिवाय अनेक प्रकारचे पक्षी मरत आहेत. यात फाल्कन, तितर, सातभाई, घुबड असे विविध पक्षी मरत असतात.कोकण, सह्याद्री भागात तर वटवाघळांचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पाहावयास मिळते. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. कारण हे पक्षी कुरतडणाºया प्राण्यांच्या गटात पूर्वीपासून समाविष्ट आहेत. शेड्युल ५ मध्ये यांचा समावेश असल्यामुळे यांना संरक्षण नाही ही विशेष बाब. या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. मात्र अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांमध्ये असल्याचे मागणीवरून दिसून येते. अनेक कारखान्यांमध्ये विचारले असता, शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात असे सांगितले जाते. आदिवासी मात्र या तेलाचा वापर कधीच करत नाहीत. मात्र, वटवाघूळ मारून आणून देतात, ते तेल बनविण्यासाठी.परदेशात मात्र वटवाघळांना १०० टक्के संरक्षण दिले आहे. भारतात वटवाघळांना संरक्षण देणे काळानुसार गरजेचे आहे. कारण इतर वन्यजीवांना जसे संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले जाते, झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे होतात आणि शेतकºयांना भरपाई मिळते. शेतकरी आणि वटवाघूळ हा विषय अलीकडच्या काळात गंभीर होत आहे. बहुतांश भागातील शेतकरी आणि वटवाघूळ संघर्ष वाढत असून, यात अनेक ठिकाणी वटवाघळे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.फलाहारी वटवाघळे करतात नुकसानसध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान काही फलाहारी वटवाघळे करीत आहेत. वटवाघूळ आपल्या वन्यजीव कायद्यानुसार मात्र यांना संरक्षण नाही त्यामुळे वन विभाग याबद्दल अजिबात सरकारी मदत देत नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.अनेक शेतकºयांचे याबाबत प्रबोधन केले. मात्र, बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्याची भरपाई शासन देत नसल्यामुळे पुढील काळातदेखील या वन्यजीवांचे प्राण जाणार यात शंकाच नाही. वन विभाग म्हणजे फक्त पर्यटन आणि जंगल विकणे यासाठीच तयार केला आहे का? या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.निसर्ग अन्नसाखळीत प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असून, वटवाघळ तर रात्रभर किटकांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात. तसेच फलाहारी वटवाघळ रात्रभर झाडांची पिकलेली फळे खाऊन बीज प्रसारण आणि बीजारोपण करण्याचे काम दररोज करीत असतात.मात्र १२३ पैकी फक्त ३ प्रजाती पिकलेल्या फळांच्या वासाने अशा बागांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यभर दिसून येत आहेत. मात्र,याविषयी कोठेही संशोधन केले जात नाही, किंवा शेतकºयाला मदत मिळत नाही, ही बाब वाईट आहे.सरकारने वटवाघळासारख्या अतिमहत्त्वाच्या सस्तन प्राण्याला लवकरात लवकर संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच याबाबत सरकारला काही अडचणी असतील तर यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर वन्यजीव कायद्याने संरक्षण देण्यात यावे.

टॅग्स :PuneपुणेNatureनिसर्ग