शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघळांना संरक्षण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:18 IST

वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.

बारामती : वटवाघळांना संरक्षण महत्त्वाचे आहे; मात्र १९७२च्या वन्यजीव कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.डॉ. गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की भारतात १२३ प्रजातींची वटवाघळे सापडतात. मात्र, त्यातील फक्त २ जातींना वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले आहे. या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्तअनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकºयांचे नुकसान होत आहे. याची नुकसानभरपाई मिळत नाही, कारण वटवाघळांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याच्या जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते. यात बागांना संरक्षण करण्यासाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे शिवाय अनेक प्रकारचे पक्षी मरत आहेत. यात फाल्कन, तितर, सातभाई, घुबड असे विविध पक्षी मरत असतात.कोकण, सह्याद्री भागात तर वटवाघळांचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पाहावयास मिळते. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. कारण हे पक्षी कुरतडणाºया प्राण्यांच्या गटात पूर्वीपासून समाविष्ट आहेत. शेड्युल ५ मध्ये यांचा समावेश असल्यामुळे यांना संरक्षण नाही ही विशेष बाब. या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. मात्र अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांमध्ये असल्याचे मागणीवरून दिसून येते. अनेक कारखान्यांमध्ये विचारले असता, शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात असे सांगितले जाते. आदिवासी मात्र या तेलाचा वापर कधीच करत नाहीत. मात्र, वटवाघूळ मारून आणून देतात, ते तेल बनविण्यासाठी.परदेशात मात्र वटवाघळांना १०० टक्के संरक्षण दिले आहे. भारतात वटवाघळांना संरक्षण देणे काळानुसार गरजेचे आहे. कारण इतर वन्यजीवांना जसे संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले जाते, झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे होतात आणि शेतकºयांना भरपाई मिळते. शेतकरी आणि वटवाघूळ हा विषय अलीकडच्या काळात गंभीर होत आहे. बहुतांश भागातील शेतकरी आणि वटवाघूळ संघर्ष वाढत असून, यात अनेक ठिकाणी वटवाघळे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.फलाहारी वटवाघळे करतात नुकसानसध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान काही फलाहारी वटवाघळे करीत आहेत. वटवाघूळ आपल्या वन्यजीव कायद्यानुसार मात्र यांना संरक्षण नाही त्यामुळे वन विभाग याबद्दल अजिबात सरकारी मदत देत नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.अनेक शेतकºयांचे याबाबत प्रबोधन केले. मात्र, बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्याची भरपाई शासन देत नसल्यामुळे पुढील काळातदेखील या वन्यजीवांचे प्राण जाणार यात शंकाच नाही. वन विभाग म्हणजे फक्त पर्यटन आणि जंगल विकणे यासाठीच तयार केला आहे का? या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.निसर्ग अन्नसाखळीत प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असून, वटवाघळ तर रात्रभर किटकांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात. तसेच फलाहारी वटवाघळ रात्रभर झाडांची पिकलेली फळे खाऊन बीज प्रसारण आणि बीजारोपण करण्याचे काम दररोज करीत असतात.मात्र १२३ पैकी फक्त ३ प्रजाती पिकलेल्या फळांच्या वासाने अशा बागांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यभर दिसून येत आहेत. मात्र,याविषयी कोठेही संशोधन केले जात नाही, किंवा शेतकºयाला मदत मिळत नाही, ही बाब वाईट आहे.सरकारने वटवाघळासारख्या अतिमहत्त्वाच्या सस्तन प्राण्याला लवकरात लवकर संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच याबाबत सरकारला काही अडचणी असतील तर यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर वन्यजीव कायद्याने संरक्षण देण्यात यावे.

टॅग्स :PuneपुणेNatureनिसर्ग