शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वटवाघळांना संरक्षण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:18 IST

वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.

बारामती : वटवाघळांना संरक्षण महत्त्वाचे आहे; मात्र १९७२च्या वन्यजीव कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.डॉ. गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की भारतात १२३ प्रजातींची वटवाघळे सापडतात. मात्र, त्यातील फक्त २ जातींना वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले आहे. या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्तअनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकºयांचे नुकसान होत आहे. याची नुकसानभरपाई मिळत नाही, कारण वटवाघळांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याच्या जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते. यात बागांना संरक्षण करण्यासाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे शिवाय अनेक प्रकारचे पक्षी मरत आहेत. यात फाल्कन, तितर, सातभाई, घुबड असे विविध पक्षी मरत असतात.कोकण, सह्याद्री भागात तर वटवाघळांचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पाहावयास मिळते. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. कारण हे पक्षी कुरतडणाºया प्राण्यांच्या गटात पूर्वीपासून समाविष्ट आहेत. शेड्युल ५ मध्ये यांचा समावेश असल्यामुळे यांना संरक्षण नाही ही विशेष बाब. या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. मात्र अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांमध्ये असल्याचे मागणीवरून दिसून येते. अनेक कारखान्यांमध्ये विचारले असता, शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात असे सांगितले जाते. आदिवासी मात्र या तेलाचा वापर कधीच करत नाहीत. मात्र, वटवाघूळ मारून आणून देतात, ते तेल बनविण्यासाठी.परदेशात मात्र वटवाघळांना १०० टक्के संरक्षण दिले आहे. भारतात वटवाघळांना संरक्षण देणे काळानुसार गरजेचे आहे. कारण इतर वन्यजीवांना जसे संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले जाते, झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे होतात आणि शेतकºयांना भरपाई मिळते. शेतकरी आणि वटवाघूळ हा विषय अलीकडच्या काळात गंभीर होत आहे. बहुतांश भागातील शेतकरी आणि वटवाघूळ संघर्ष वाढत असून, यात अनेक ठिकाणी वटवाघळे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.फलाहारी वटवाघळे करतात नुकसानसध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान काही फलाहारी वटवाघळे करीत आहेत. वटवाघूळ आपल्या वन्यजीव कायद्यानुसार मात्र यांना संरक्षण नाही त्यामुळे वन विभाग याबद्दल अजिबात सरकारी मदत देत नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.अनेक शेतकºयांचे याबाबत प्रबोधन केले. मात्र, बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्याची भरपाई शासन देत नसल्यामुळे पुढील काळातदेखील या वन्यजीवांचे प्राण जाणार यात शंकाच नाही. वन विभाग म्हणजे फक्त पर्यटन आणि जंगल विकणे यासाठीच तयार केला आहे का? या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.निसर्ग अन्नसाखळीत प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असून, वटवाघळ तर रात्रभर किटकांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात. तसेच फलाहारी वटवाघळ रात्रभर झाडांची पिकलेली फळे खाऊन बीज प्रसारण आणि बीजारोपण करण्याचे काम दररोज करीत असतात.मात्र १२३ पैकी फक्त ३ प्रजाती पिकलेल्या फळांच्या वासाने अशा बागांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यभर दिसून येत आहेत. मात्र,याविषयी कोठेही संशोधन केले जात नाही, किंवा शेतकºयाला मदत मिळत नाही, ही बाब वाईट आहे.सरकारने वटवाघळासारख्या अतिमहत्त्वाच्या सस्तन प्राण्याला लवकरात लवकर संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच याबाबत सरकारला काही अडचणी असतील तर यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर वन्यजीव कायद्याने संरक्षण देण्यात यावे.

टॅग्स :PuneपुणेNatureनिसर्ग