शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी; विधी विभागातील विद्यार्थ्यांनी केला मसुदा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:39 IST

शेतकऱ्यांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विधी विभागातील काही विद्यार्थ्यांनी शेतीतज्ज्ञ व शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून यासाठीच्या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय राज्यघटनेत शेतकऱ्यांसंबधी स्वतंत्र कलम, मात्र त्याचा वापरच नाहीहा मसुदा संसदेत मान्य झाल्यास स्वतंत्र न्यायाधिकरण अस्तित्वात येईल : सरोदे

पुणे : देशातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांना दाद मागता यावी व त्वरीत निकाल व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विधी विभागातील काही विद्यार्थ्यांनी शेतीतज्ज्ञ व शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून यासाठीच्या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे.खासदार राजीव सातव यांच्याशी याविषयी संपर्क साधण्यात आला असून त्यांनी लोकसभेच्या येत्या अधिवेशनात खासगी विधेयक म्हणून हा मसुदा मांडण्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले आहे. विधीज्ञ असीम सरोदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय कृषी उत्पादन भाव निश्चिती न्यायाधिकरण कायदा २०१८ असे या मसुद्याचे नाव असेल अशी माहिती सरोदे यांनी दिली. शेतकऱ्यांवरच्या अन्यायाचे विविध दावे या स्वतंत्र न्यायालयात चालवता येतील असे ते म्हणाले.शेतमालाला आधारभूत भाव न मिळाल्याने देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. भारतीय राज्यघटनेत शेतकऱ्यांसंबधी स्वतंत्र कलम आहे, मात्र त्याचा वापरच केला जात नाही. त्याविरोधात दाद मागण्यासाठी देशात कुठेही स्वतंत्र यंत्रणा नाही. हा मसुदा संसदेत मान्य झाल्यास स्वतंत्र न्यायाधिकरण अस्तित्वात येईल व शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळेल असा दावा सरोदे यांनी केला.हा मसुदा तयार करण्यासाठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी दीपक चटप, वैष्णव इंगोले, राकेश माळी, अमीर शेख यांनी काम केले. ते करताना त्यांना डॉ. विश्वंभर चौधरी,  शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. गिरीधर पाटील, किसानपूत्र आंदोलनाचे संस्थापक अमर हबीब यांचे साह्य झाले. शेतकरी व शेतीप्रश्न यांचा अत्यंत बारकाईने या मसुद्यात विचार करण्यात आला आहे. देशातील सर्वच खासदारांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन सरोदे यांनी केले.

टॅग्स :Puneपुणे