शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

डेल्टा सिरॅमिक संशोधनातून नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:24 AM

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी झाल्यास एकदा बसवलेला सांधा ४० वर्षे वापरता येईल. बरेचदा रुग्ण इंटरनेटच्या साह्याने व्याधी आणि उपचार याबाबत माहिती मिळवतात. परंतु, एकाच वेळी २-३ व्याधी असल्यास डॉक्टर एकत्रित विचार करून उपचार करू शकतात. इंटरनेट ते काम करू शकत नाही, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.माझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील किराणामालाचे दुकान चालवत असत. मी अभ्यासातही हुशार नव्हतो. दहावीला कमी गुण मिळाले होते. त्यानंतर मात्र करिअरकडे गांभीर्याने पाहायचे ठरवले. आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने प्रवास सुसह्य झाला आहे. आजपर्यंत ५१ वर्षे रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही कारणाने गुडघ्याचे सांधे खराब झाले की ते बदलणे ही खर्चिक बाब असते. परदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने सांधे बदलासाठी १ लाख रुपयाच्या दरम्यान खर्च येतो. या तुलनेत भारतीय बनावटीचा सांधा बसवण्याचा खर्च केवळ २५-३० हजार रुपये असतो. सांधा-बदलाबाबत मी केलेल्या संशोधनाला २००५ मध्ये पेटंट मिळाले. आजवर मी २० हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पूर्वी शस्त्रक्रिया करून नवा सांधा बसवल्यानंतर तो वाकत नसे. आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया सुलभ झाली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रमाण गेल्या २ वर्षांमध्ये वाढले आहे. यामध्ये सांध्याचा सिटी स्कॅन केला जातो. सॉफ्टवेअरच्या आधारे हाड किती कापायचे अथवा घासायचे, हे रोबोटद्वारे ठरवून अत्यंत सुलभ शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाच्या वेदना कमी होऊन त्याला २ दिवसांमध्ये घरी जाता येते. पूर्वी लहान-मोठा अपघात झाल्यानंतर प्लास्टर घालून उपचार करता येणे शक्य होते. आता भरधाव वाहनांनी धडक दिल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघातामुळे ४-५ हाडे मोडतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. अद्ययावत उपकरणांमुळे शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. सांधेरोपण आणि हाडे बसवण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये खूप प्रगती झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर एक-दोन दिवसांत रुग्णाला घरी जाता येते, त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होते. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाही तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत. सध्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.भारतात गुडघ्यांच्या विकारांचे प्रमाण खूप जास्त आहे. हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये जास्त आहे. कमी चालणे, उन्हात न जाणे यामुळे माझ्याकडे येणाऱ्या एकाआड एक रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. ३० वरून हे प्रमाण १०-१२ पर्यंत घटले आहे. हाडांचे दुखणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, नियमित व्यायाम, सकस आहार ही आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. केवळ चालण्याचा व्यायाम करून सुदृढ राहता येत नाही. स्नायूंच्या विकासासाठी सूर्यनमस्कार हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी व्यायामावर भर द्यायला हवा. बरेचदा हाडांचे दुखणे अंगावर काढले जाते. दुर्लक्ष केल्याने काही कालावधीने मोठे दुखणे उद्भवते. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील भावनिक नाते कमी झाले आहे. डॉक्टर खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना रुग्णांशी संवाद साधता येत नाही. डॉक्टर आपल्याकडून पैसा उकळतात, अशी भावना रुग्णांमध्ये वाढीस लागते. एखाद्या डॉक्टरचे मत न पटल्यास सेकंड ओपिनियन घेण्यास प्राधान्य दिले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाचा पूल निर्माण व्हावा. वैद्यकीय शिक्षण घेत असताना खूप पैसा खर्च होत असल्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावर डॉक्टर व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारतात. व्यावसायिक व्हायला हरकत नाही, मात्र, रुग्णांशी प्रामाणिक राहणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रेम, आस्था निर्माण व्हायला हवी. आत्मचरित्र लिहिण्याचा विचार असल्याचेही संचेती म्हणाले.