शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:54 IST

उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केला. हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, प्रयागधाम या भागातील शेतकरी गेल्या १५ ते १८ दिवस झाले महावितरणच्या गचाळ नियोजनाने, कारभारामुळे जळालेली विद्युत जनित्रे न बसविल्याने वैतागले आहेत.

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केला. हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, प्रयागधाम या भागातील शेतकरी गेल्या १५ ते १८ दिवस झाले महावितरणच्या गचाळ नियोजनाने, कारभारामुळे जळालेली विद्युत जनित्रे न बसविल्याने वैतागले आहेत.हवेली तालुक्यातील नदीकाठच्या गावांच्या शेतकºयांवर शेतातील उभी पिके जळताना बघण्याची वाईट स्थिती उद्भवली असल्याची तक्रार अष्टापूरचे विद्यमान सरपंच नितीन अंकुश मेमाणे यांनी केली आहे. प्रयागधाम येथील एक विद्युत जनित्र गेल्या १५ महिन्यांपासून मंजूर असूनही अद्याप बसविले नाही, ते तातडीने बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शेतात उभी असलेली पिके प्रचंड उन्हाच्या तडाख्याने नदीत पाणी असूनही केवळ विजेअभावी उपसा सिंचन योजनेच्या मोटारी चालू करता येत नाहीत या कारणामुळे डोळ्यांदेखत जळताना पाहताना डोळ्यात पाणी येत असताना महावितरणच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराला वैतागून सोमवारी हे शेतकरी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांच्या कानावर गाºहाणे घालण्यासाठी आले असता, या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने या शेतकºयांनी सुमारे एक ते दीड तास वाट बघून कोणीच आपली दाद-दखल घेत नाहीत.या कारणास्तव चिडून जाऊन फुलांच्या दुकानातून एक हार आणून गांधीगिरी करीत उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांची त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी बदली केली आहे. त्यांच्या जागी अजूनही कोणाचीच नेमणूक केली नसल्याने या कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. या उपविभागाचा कार्यभार अतिरिक्त स्वरूपात उरुळी कांचन शाखेचे (ग्रामीण) सहायक अभियंता व्यंकट गीर यांच्याकडे दिला आहे. त्यांना त्यांच्या शाखेचा कारभार करतानाच हा वरिष्ठ कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सांभाळताना जिकिरीचे होऊन गेले आहे असेच म्हणावे लागेल.या अनोख्या निषेध आंदोलनात नितीन मेमाणे, पंडित जगताप, पुनाजी जगताप, राहुल कोतवाल, संदीप जगताप, गोरख चौधरी, विलास जगताप, दत्तात्रय जगताप, संजय चौधरी, तुकाराम बहिरट, विठ्ठल कोतवाल, संपत कोतवाल, राजेंद्र जगताप, बाळासाहेब चौधरी, शरद चव्हाण, सुभाष कोतवाल, ज्ञानोबा चौधरी, पोपट चौधरी, मुरलीधर आंबेकर इत्यादी शेतकºयांनी सहभाग घेऊन महावितरण प्रशासनाचा निषेध केला.मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आज या भागात बसविण्यासाठी दोन जनित्रे देत आहोत व आणखी दोन जनित्रे येत्या दोन दिवसांत देण्याची व्यवस्था केली जाईल. त्या भागातील शेतकºयांच्या अडचणी सोडविण्यात येतील.प्रभारी उपकार्यकारी अभियंता तथा सहायक अभियंता व्यंकट गीर यांच्याशी संपर्क साधला असता, मी वरिष्ठ कार्यालयात असलेल्या बैठकीसाठी चाललो असल्याने कार्यालयात उपस्थित नाही. पण या शेतकºयांच्या भावना समजू शकतो. त्यांना लवकरात लवकर विद्युत जनित्रे बसवून देऊन त्यांची समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या