शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Maratha Reservation: कायदा हातात घेऊन बसेस जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 22:44 IST

मराठा मोर्चाच्या कोणत्याही आयोजकांवर किंवा निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत, मात्र चाकणमधील कालच्या आंदोलनात ज्यांनी कायदा हातात घेतला

चाकण : मराठा मोर्चाच्या कोणत्याही आयोजकांवर किंवा निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत, मात्र चाकणमधील कालच्या आंदोलनात ज्यांनी कायदा हातात घेतला. ज्यांनी बसेस जाळल्या त्या दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चाकण येथे केले.येथील पोलीस ठाण्यात त्यांनी खेड तालुक्यातील मराठा मोर्चातील आयोजकांची संवाद साधला. ते म्हणाले, चाकणला औद्योगिक केंद्र म्हणून समजले जाते. हा मोर्चा नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे म्हणून सुरू झाला. त्यानिमित्ताने समाजबांधव रस्त्यावर आले. त्यांची मागणी योग्य असल्याने त्यांना पाठिंबा आहे. चाकणसारखं गाव दोन ते अडीच लाख लोकांना नोकऱ्या देत असतं. इथे शांतता राहावी, इथे ज्या वेगवेगळ्या परदेशी गुंतवणूक आहेत, त्याच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, ते फार महत्त्वाचे आहे आणि म्हणून पिंपरी-चिंचवडला नवीन आयुक्तालय स्थापन होत आहे. आपला चाकणचा परिसर त्या आयुक्तालयाचा भाग होत आहे. त्यानंतर अधिकचा पोलीस फोर्स आपल्याला उपलब्ध होणार आहे. आज मनं जुळवण्याची गरज आहे.ते पुढे म्हणाले, मराठा समाजाचे वैशिष्ट्य आहे की लाखोंचे मोर्चे निघाले, त्यात कुठलाही हिंसाचार झाला नाही, साधा एक दगडही उचलला गेला नाही. कारण मराठा समाज महाराष्ट्राला अनेक वर्षे राजकीय नेतृत्व देत आहे आणि त्यामुळे सर्व मोर्चे शांततेत निघाले. समाजातील दुर्लक्षित वर्गाला आरक्षण देण्याची व शैक्षणिक आरक्षण देण्याची गरज आहे आणि खरी गरज आहे. ज्या मोठ्या योजना आहेत त्यात विशेषतः शिष्यवृत्तीची गरज आहे. अनेक मुलं डॉक्टर, वकील, इंजिनीअर होत असताना त्यांची पन्नास टक्के फी शासन भरणार आहे. या योजना जाहीर केल्यानंतर समाजापर्यंत पोहोचतात की नाही हेसुद्धा बघितले गेले पाहिजे, यासाठी शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली आहे.अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की आण्णासाहेब महामंडळाकडे जावे लागते, तुम्ही कुठल्याही बँकेकडे जाऊन आपण या समाजाचे आहे म्हणून अर्ज करावा व त्याची सबसिडी अण्णासाहेब महामंडळाकडून मिळण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ती आपल्या तरुणांना मिळू शकते. चाकणसारख्या गावात अनेक तरुण उद्योजक बनू शकतात. या पुढील काळात स्वयंरोजगाराचा कार्यक्रम राबविण्यात येईल.ते म्हणाले, आपण जरी सांगत असाल की हे लोक बाहेरचे होते, तर आपली पण जबादारी आहे की, हे लोक कोण होते, मी तुम्हाला आवाहन करतो की, आपल्यापैकी कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर खटले दाखल होणार नाहीत. परंतु ज्या लोकांनी हे भीतीचं वातावरण निर्माण केलं, ही लोक तुम्हाला दाखवायला लागतील. फोटो व सीसीटीव्ही फुटेजवरून माणसे ओळखायची आहेत. कोणताही भाडेकरू ठेवायचा असेल तर त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. येथील इंडस्ट्रीज व परदेशी उद्योजकांना दिलासा देण्याची गरज आहे.नाही तर त्यांच्यामध्ये परदेशात आपल्या बद्दल काय प्रतिमा जाईल हे पहिले पाहिजे व नवीन उद्योग येतील की नाही याचा विचार केला पाहिजे. पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनी ग्रुप बनवून हे लोक बाहेर हुसकावून लावले हे कौतुकास्पद आहे. आमदार सुरेश गोरे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या वेळी प्रांताधिकारी आयुष्य प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि मोर्चाचे आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maratha Reservationमराठा आरक्षण