शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या पातळीत होतेय घट, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:20 IST

जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.

शेटफळगढे - जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.पुणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात छोटी-मोठी तब्बल २५ धरणे आहेत. ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. जिल्ह्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरू आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यातआली आहेत, तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे, पाणी साठवणक्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्रम राबविले जातात.धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. पारा ३५ अंशांच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकणार असल्याची चिन्हे गडद झाली आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार यात शंकाच नाही. खडकवासल्यावर पुणे शहर व ग्रामीण भागातील पाणी योजना आणि हजारो एकर शेती अवलंबून आहे.उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर या तिन्हींसाठी वरदान ठरले असल्यामुळे या धरणातील पाण्यावरून कायमच रणकंदन होत असते. यंदा हे धरण ओसंडून वाहिले. पुणे ग्रामीण भागातील शेतकºयांच्या हक्काच्या पाण्यावर सोलापूरकरांनी डल्ला मारल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हक्काचे पाणी सोलापूरला जाण्यापासून रोखले होते.प्रमुख धरणांतील पाणीसाठापिंपळगाव जोगे : ४२.६४माणिकडोह : ४७.७९येडगाव : ५७.९४डिंभे : ५६.२३घोड : ४१.१५कळमोडी : ९८.०७चासकमान : ४८.६७भामा-आसखेड : ७३.२०पवना : ५५.०७मुळशी : ४३.२३टेमघर : ०.०पानशेत : ६६.१४खडकवासला : ८१.४३गुंजवणी : ३८.८६नीरा-देवघर : ५१.७९भाटघर : ६९.५६वीर : ६०.४२नाझरे : ३५.०२उजनी : ७३.१९1 खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर दौंड हवेलीसह बारामतीच्या काही गावची शेती गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आली आहे. यंदा तरी शेतीला पाणी येईल, या आशेवर या तालुक्यातील शेतकरी आहेत.2मात्र उन्हाळ्यात शेतीला पाणी किती देणार, हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि किती सोडले पाहिजे, याचे नियोजन हवे. पाऊस यंदा होऊनदेखील शेतीला पाणी नाही, अशी वेळ शेतकºयांवर येऊ नये. यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेWaterपाणी