शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:09 IST

जिल्ह्यात या वर्षी १९७२ साली पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. आतापासून पाणी वापरताना काटकसर करणे गरजेचे आहे.

पुणे : जिल्ह्यात या वर्षी १९७२ साली पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. आतापासून पाणी वापरताना काटकसर करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, तसेच टंचाई आराखड्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली. कालवा समितीच्या बैठकीत सध्या दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात १ आवर्तन देण्यास अनुकूलता दर्शविली आहे, असे असले तरी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनासारख्या पाणी वाचवणाºया योजना राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत पाण्याची भीषण परिस्थिती आहे. आवर्तनावरच येथील पाणी पुरवठा अवलंबून असतो. शासनाने जिल्ह्यातील केवळ १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण १३ तालुक्यात पाण्याची भीषण स्थिती आहे. नद्या, तसेच पाण्याचे अनेक उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे. यामुळे उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती राहणार आहे. अशा स्थितीतही पाण्याचे आवर्तन मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.नुकत्याच मुंबई येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंसाधन आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सध्य स्थितीत दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात तीन आवर्तने देण्याचे मान्य केले आहे. असे असले तरी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकºयांनी पिण्याच्या पाण्याला जास्त प्राधान्य द्यावे.पाण्याचा काटकसरीने वापर करावा. यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन वापरावे जेणे करून पाण्याची बचत होईल.>दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठकाजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता लवकरच तालुकानिहाय बैठका घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गावातील पाण्याचा आढावा घेऊन काय नियोजन करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गेल्या वर्षी टंचाईची अनेक कामे झालीत मात्र, त्यांची बिले अद्यापही मिळालेली नाहीत. यामुळे शासनाने ही बिले त्वरित द्यावी. या बरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्याला आणखी निधी द्यावा, अशी मागणीही देवकाते यांनी केली.>उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आताच ही स्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर दुष्काळनिवारणासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. येणाºया परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.-विश्वास देवकाते,अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :droughtदुष्काळ