शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा ठेवीदारांचा आक्रोश आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:06 IST

गेल्या ९ वर्षांपासून रुपी को-ऑप. बँकेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने सर्व ठेवीदार हवालदिल झाले आहेत

ठळक मुद्देरुपी बँक ठेवीदार हक्क समितीकडून यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून त्यावर देखील लवकर निकाल लागण्याची गरज आहे

पुणे: रुपी बँकेच्या विलीनीकरणाबाबत राज्य शासनाच्या सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने त्वरीत कार्यवाही करुन ठेवीदारांना दिलासा देण्याची गरज असल्याचे अन्यथा ठेवीदारांचे आक्रोश आंदोलन करण्यात येईल, अशा स्वरुपाचे निवेदन आज ठेवीदार हक्क समितीने सहकार आयुक्त अनिल कवडे यांना बँकेचे प्रशासक सुधीर पंडीत यांच्या उपस्थितीत दिले. ठेवीदार हक्क समितीच्या वतीने श्रीरंग परसपाटकी, भालचंद्र कुलकर्णी यांनी निवेदन दिले. 

गेल्या ९ वर्षांपासून रुपी को-ऑप. बँकेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने सर्व ठेवीदार हवालदिल झालेले आहेत. सुमारे ५ लाख ठेवीदारांचे १३०० कोटी बँकेत अडकून पडले आहेत. गेल्या काही वर्षात ठेवीदारांनी सहकार खात्याबरोबरच रिझर्व्ह बँकेकडे देखील अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली आहेत. मात्र दुर्दैवाने त्यावर काहीही घडलेले नाही. प्रशासक मंडळाची सध्याची मुदत येत्या ३१ ऑगस्टला संपणार असल्याने यापुढे रिझर्व्ह बँकेकडून मुदतवाढ मिळाली नाही तर ठेवीदारांपुढे अडचणी निर्माण होतील, त्यामुळे हा प्रश्‍न त्यापूर्वी सोडवला जावा अशी आमची आग्रही मागणी आहे. 

नुकत्याच झालेल्या बँकिंग रेग्यूलेशन अ‍ॅक्टमधील सुधारणांमुळे रिझर्व्ह बँकेला सहकारी बँकांवर पूर्ण नियंत्रण मिळाले आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सर्वच ठेवीदारांचे संरक्षण केले पाहिजे. ज्याप्रमाणे अन्य खाजगी बँकांचे विलिनीकरणाचे प्रश्‍न रिझर्व्ह बँक तत्परतेने हाताळले आहेत, त्याचप्रमाणे सहकारी बँकांबाबत देखील सकारात्मकपणेे त्वरीत पावले उचलली पाहिजेत.

खाजगी, राष्ट्रीयकृत बँकांचे ठेवीदार आणि सहकारी बँकांच्या ठेवीदार, खातेदारांमध्ये रिझर्व्ह बँक भेदभाव करीत असल्याचा आरोप देखील यावेळी समितीच्या वतीने करण्यात आला. रुपी बँक ठेवीदार हक्क समितीकडून यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून त्यावर देखील लवकर निकाल लागण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासनाने त्वरीत पावले उचलण्याची गरज आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने सर्व ठेवीदार आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेbankबँकRupee Bankरुपी बँकEmployeeकर्मचारीGovernmentसरकार