शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

खडकवासला-फुरसुंगी बोगद्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतरच- अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: October 20, 2023 18:46 IST

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते...

पुणे : ‘खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत बंदिस्त बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, बोगदा झाल्यानंतर ती जागा महापालिकेला देऊन त्या बदल्यात ‘टीडीआर’ अर्थात हस्तांतरणीय विकास हक्क मिळाल्यास बोगद्याचा खर्च कमी होऊ शकतो, असे मत जलसंपदा विभागाने मांडले आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीत महापालिका व जलसंपदा विभाग यांना मिळून यावर निर्णय घेण्यास सांगू,’ अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “जलसंपदा विभागाने खडकवसला धरणाचे पाणी फुरसुंगीपर्यंत कालव्याद्वारे नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे अडीच ते तीन टीएमसी पाणी वाचू शकते. बोगदा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी नाही. हा कालवा शहरातून गेला आहे. बोगदा केल्यास दोन्ही बाजूंनी रस्ते असून काही जागा शिल्लक आहे, ही जागा पुणे महापालिकने ताब्यात घ्यावी आणि त्याबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) द्यावा. टीडीआर दिल्यास मोठी रक्कम मिळू शकते. त्याद्वारे बोगद्याचे काम होऊ शकते, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने दिला आहे.

३०० काेटींच्या बाेगद्यासाठी आता लागणार २ हजार काेटी

उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी याबाबत बैठक घेतली होती. पूर्वी या प्रकल्पाची किंमत ३०० ते ३५० कोटी इतकी होती. आता ती २ हजार कोटींपर्यंत पोचली आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेवून काम करू नका, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा निर्णय घेताना नगरविकास, जलसंपदा, महसूल विभागांचा सहभाग आवश्यक आहे. या विभागांनी त्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. दसऱ्यानंतर बैठक घेऊन त्याचा आढावा घेईन. त्यावेळी ‘जलसंपदाचा हा प्रस्ताव कुठपर्यंत आला आहे, याची माहिती घेईन.”

मुळशीबाबतही निर्णय

मुळशी येथील टाटा धरणातील ५ टीएमसी पाणी पुणे शहराला देण्याबाबत निवृत्त जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. राज्य सरकारने तो मान्य केला आहे. या अहवालावर सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार