शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भीमानदी पुलावरून धोकादायक वाहतूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:20 IST

दौंडच्या भीमा नदीवरील दौंड-अहमदनगरकडे जाणारा पूल धोकादायक झाला असून या पुलाला केव्हा जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

दौंड : दौंडच्या भीमा नदीवरील दौंड-अहमदनगरकडे जाणारा पूल धोकादायक झाला असून या पुलाला केव्हा जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलावरील रस्ता अरूंद स्वरूपाचा आहे. साधे दुचाकी वाहन जरी गेले तरी पुलाला हादरे बसतात, तर जड वाहने आल्यानंतर पुलाचा रस्ता खाली वर होतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे या खड्ड्यात वाहने अडकून अपघात झाल्याचे प्रमाण यापूर्वी घडलेले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कठडे कमकुवत स्वरूपाचे आहेत. दौंडवरून नगरकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. पुलाला वापरलेले निकृष्ट साहित्य आणि त्यातच पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर वाळूमाफियांनी वाळूउपसा केला असल्याने पुलाच्या प्रत्येक खांबाला तडे गेलेले आहेत.पथदिव्यांचा अभाव : जीव मुठीत धरून प्रवासपुलावर पथदिवे नसल्यामुळे या पुलावरून रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दौंडवरून नगरकडे जाताना आणि नगरहून दौंडकडे येताना अशा दोन वाहनांची या पुलावर क्रॉसिंग झाली तर वाहतुकीस अवघड होऊन बसते. कुठले वाहन केव्हा नदीत कोसळेल, याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे वाहनचालकदेखील जीव मुठीत धरून या पुलावरून वाहने चालवतात. पुलाच्या परिसरात नेहमीच नदीपात्रातील पाणी असल्याने यापूर्वी दुचाकीचालक पुलावरून कोसळून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत.पुलावरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे २६ आॅक्टोबर २०१६ रोजी वाळूचा ट्रक पुलाचा संरक्षक कठडा तोडून पुलावर अधांतरी अडकला होता. दरम्यान, या घटनेत पाण्यात पडून दोघा युवकांचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. एकंदरीतच हा पूल मृत्यूचा सापळा झाला आहे. तेव्हा शासनाने या पुलाची वेळीच डागडुजी करावी; अन्यथा मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.