शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भीमानदी पुलावरून धोकादायक वाहतूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:20 IST

दौंडच्या भीमा नदीवरील दौंड-अहमदनगरकडे जाणारा पूल धोकादायक झाला असून या पुलाला केव्हा जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

दौंड : दौंडच्या भीमा नदीवरील दौंड-अहमदनगरकडे जाणारा पूल धोकादायक झाला असून या पुलाला केव्हा जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलावरील रस्ता अरूंद स्वरूपाचा आहे. साधे दुचाकी वाहन जरी गेले तरी पुलाला हादरे बसतात, तर जड वाहने आल्यानंतर पुलाचा रस्ता खाली वर होतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे या खड्ड्यात वाहने अडकून अपघात झाल्याचे प्रमाण यापूर्वी घडलेले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कठडे कमकुवत स्वरूपाचे आहेत. दौंडवरून नगरकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. पुलाला वापरलेले निकृष्ट साहित्य आणि त्यातच पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर वाळूमाफियांनी वाळूउपसा केला असल्याने पुलाच्या प्रत्येक खांबाला तडे गेलेले आहेत.पथदिव्यांचा अभाव : जीव मुठीत धरून प्रवासपुलावर पथदिवे नसल्यामुळे या पुलावरून रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दौंडवरून नगरकडे जाताना आणि नगरहून दौंडकडे येताना अशा दोन वाहनांची या पुलावर क्रॉसिंग झाली तर वाहतुकीस अवघड होऊन बसते. कुठले वाहन केव्हा नदीत कोसळेल, याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे वाहनचालकदेखील जीव मुठीत धरून या पुलावरून वाहने चालवतात. पुलाच्या परिसरात नेहमीच नदीपात्रातील पाणी असल्याने यापूर्वी दुचाकीचालक पुलावरून कोसळून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत.पुलावरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे २६ आॅक्टोबर २०१६ रोजी वाळूचा ट्रक पुलाचा संरक्षक कठडा तोडून पुलावर अधांतरी अडकला होता. दरम्यान, या घटनेत पाण्यात पडून दोघा युवकांचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. एकंदरीतच हा पूल मृत्यूचा सापळा झाला आहे. तेव्हा शासनाने या पुलाची वेळीच डागडुजी करावी; अन्यथा मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.