पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे साईनाथ मंडळाजवळ असलेला नवीन पूल पूर्णपणे बंद केला आहे. तरी काही नागरीक तारेवरची कसरत करत छुप्या रस्त्यांनी ये- जा करत आहेत. पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाण्याची शक्यता आहे . परंतु, नागरिकांना या गंभीर धोक्याची जरा देखील परवा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सध्या कॅनॉल हा पाण्याने पूर्ण क्षमतेने वाहत असून यात कुणी वाहून गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
...............................
जनता वसाहतीत स्थानिक नगरसेवक,आणि नेते मंडळीचे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर धोक्यावर लवकर कारवाई करणे आवश्यक आहे ,यावर पोलिसांनी कारवाई करावी.संदीप काळे स्थानिक रहिवाशी दांडेकर पूल -