भामा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने वाहतुकीस धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:28+5:302021-01-08T04:30:28+5:30
चाकण - शिक्रापूर हायवेवरून काळूसमार्गे पुणे - नाशिक महामार्गाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगरला जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. तसेच काळूसलगतच्या ...

भामा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने वाहतुकीस धोका
चाकण - शिक्रापूर हायवेवरून काळूसमार्गे पुणे - नाशिक महामार्गाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगरला जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. तसेच काळूसलगतच्या अनेक गावांनाही हा मार्ग जोडत असल्याने नित्याने या पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पुलावरील खराब रस्ता आणि अरुंद पूल वाहतुकीस डोकेदुखी ठरत आहे. एकाच वेळी दोन मोठी वाहने पुलावर आल्यानंतर जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. परिणामी, ऊस वाहतूक करणारे तसेच बांधकाम साहित्यांची वाहतूक करणारे असंख्य अवजड ट्रक या पुलावरून ये - जा करत आहेत. गावातील नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, अरुंद पुलामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने येथील पुलाची रुंदी वाढवून त्याला मजबूत दगडी कठडे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
फोटो
काळूस (ता. खेड) येथील भामा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने धोकादायक अवस्थेत असलेला अरुंद पूल. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)