शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

सिंधू, मोहेंजोदडो संस्कृतीला पोहोचतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:31 IST

एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहेंजोदडो ही शहरे साडेपाच हजार वर्षांपूर्वीची नसून, आठ हजार वर्षांंपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

- नम्रता फडणीस पुणे : एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहेंजोदडो ही शहरे साडेपाच हजार वर्षांपूर्वीची नसून, आठ हजार वर्षांंपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. परंतु सद्यस्थितीत जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली मोहेंजोदडो ही साइट धोक्यात सापडली आहे. साइटचे संवर्धन कसे करायचे यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू वसंत शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे.भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे संबंध असले तरी जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ‘मोहेंजोदडो’ या स्थळाच्या संवर्धनासाठी भारताला मदतीची साद घालण्यात आली. राजकीय पटलावर एकमेकांचे शत्रू मानल्या जाणाऱ्या या दोन देशांमध्ये कला-संस्कृतीच्या गुंफणातून का होईना सहकार्याचा पूल तयार झाला आहे. विशेष म्हणजे, सिंध सरकारने मार्गदर्शन करण्यासाठी देश-विदेशातून आमंत्रित केलेल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये एका ‘पुणेरी’ व्यक्तीचा समावेश होता. ही पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.साधारणपणे आठ हजार वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांच्या मानवी वस्तीचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले. मोहेंजोदडो व हडप्पा या उत्खननात सापडलेल्या शहरांचा काही भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला असला तरीही ही शहरे भारतीय उपखंडाचा आणि मानवी इतिहासाचाच अविभाज्य अंग आहेत. या साइटवर अनेक संशोधने करण्यात आली. त्यामध्ये पुणे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही साडेपाच हजार वर्षांपूर्र्वीची नसून, आठ हजार वर्षांपूर्वीची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली मोहंजोदडो ही साइट धोक्यात सापडल्याने त्याचे संवर्धन कसे करायचे? असा यक्षप्रश्न सिंध सरकारसमोर उभा ठाकला. यासाठी सरकारने काही देश-विदेशातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांची मदत घेतली, त्यामध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू वसंत शिंदे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्या अनुभवाविषयी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.शिंदे म्हणाले, पाकिस्तानात दोनदा जाण्याची संधी मला मिळाली. एकदा इस्लामाबाद येथे साऊथ एशियाची परिषद होती. त्यानंतर सिंध सरकारने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या ‘मोहेंजोदडो’च्या संवर्धनासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते. त्यात भारतातून निवड होणारा मी एकमेव होतो.ं तिथे गेल्यानंतर लक्षात आले की संवर्धनासाठी सिंध सरकारकडून काही चुका झाल्या होत्या. मोहेंजोदडो जेव्हा जागतिक वारसा म्हणून घोषित झाले तेव्हा त्यांनी जे तज्ज्ञ बोलावले होते ते युरोपियन होते. युरोपियन हवामानाला अनुसरून जी पद्धत विकसित केली होती, ती पद्धतच त्यांनी या ठिकाणी वापरली. सिंधमधले वातावरण युरोपियन हवामानापेक्षा खूप वेगळे आहे. हे त्या तज्ज्ञांच्या लक्षात आले नाही. पण सिंध सरकारला दोन ते तीन वर्षांनंतर कळले की विटांचे आतून नुकसान झाले आहे आणि त्याचा भुगा होत चालला आहे. काँक्रिटवर टाकून ते दुरुस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र अधिकच नुकसान झाले.तिथे गेल्यावर काही स्थानिक लोकांशी बोलून माहिती काढून घेतली. इथले स्थानिक लोक संवर्धनासाठी जे तंत्र वापरतात, ते वापरले तर पुढील दहा वर्षे मोहंजोदडोला धक्का लागणार नाही. मातीमध्ये सुकलेले गवत, पालापाचोळ्याचा लेप दिला तर साईटचे संवर्धन होईल, असा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.> दोन देशांत तणावाची स्थिती असली तरी शासकीय पाहुणा म्हणून अत्यंत सन्मानाची वागणूक मला मिळाली. भारत-पाकिस्तानची संस्कृती किंवा समस्या एकच आहेत; पण राजकीय वैमनस्यामुळे त्यावर तोडगा निघू शकत नाही. पाकिस्तानातून जाऊन आल्यानंतर सुरुवातीला मेलद्वारे संभाषण व्हायचे. मात्र आता दोन्ही देशातील संबंध खूपच बिघडल्याने त्यांच्याकडून ई-मेल येणे बंद झाले आहे- वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणे