शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 17:21 IST

७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन सरपण डोक्यावर आणतात

ठळक मुद्देमांगनेवाडीत गॅस ना रॉकेल : उज्ज्वल गॅस योजना २५ कुटुंबांपुरतीचअंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने तो करण्यासाठी खूप संघर्ष

मोहन लांडे - मढ :  मढ आणि जुन्नर गावापासून केवळ दहा किमी अंतरावर असणाऱ्या मांगनेवाडी या गावातील २५ कुटुंबे सोडली तर इतर सर्वच कुटुंबीयांना महिलांना घरातील चूल पेटविण्यासाठी डोईवर सरपण घेऊन पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही या गावात केवळ २५ घरांमध्ये गॅस कनेक्शन आले आहे, तर उर्वरित घरामध्ये चुलीचा धूर निघतो. या धुरात या गावाचा विकास अद्यापही हरवून गेलेला आहे. त्यामुळे टीचभर पोटाची भूक मिटविण्यासाठी येथील महिलांच्या डोईवर अजूनही सरपणाचा भार वाहावा लागतो.जुन्नरच्या बाजूला गणेशखिंडीच्या पायथ्याशी सह्याद्री डोंगररांगेतील  मांगणी डोंगराच्या कुशीत वसलेली ६५ ते ७० घरांची वस्ती म्हणजे मांगनेवाडी. आजही आदिवासी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपली उपजीविका चालविण्यासाठी अजूनही ७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन वाळलेले सरपण डोक्यावर आणताना त्यांना जिवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. स्वत:च्या घराची जागा सोडली तर सर्वच कुटुंबे ही भूमिहीन आहेत. शेतजमिनी नसल्याने मिळेल ते काम आणि मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. याशिवाय विशेष म्हणजे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठीसुद्धा अडचण निर्माण होते. अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने अनेकांच्या हातापाया पडून मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी खूप संघर्ष आणि यातना सहन कराव्या लागतात...............सरपण आणताना पडल्याने महिलांचा गेला जीवआदिवासी बांधवांच्या डोक्यावरील मोळी खाली कधी येणार, हादेखील आदिवासी भागातील एक ज्वलंत प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आजही डोक्यावर सरपण वाहत आपली उपजीविका करण्याचे काम आदिवासी बांधवांना करावे लागत आहे. मागील महिन्यात करंजाळे येथील महिला सीताबाई रोहिदास भांगले वय वर्षे ३६ सरपण आणण्यासाठी रानात गेली असता पाय घसरून पडली, डोक्यावरील मोळी अंगावर पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.........शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचावेत

शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ खरोखरच गरजू लाभार्थ्यांना मिळतो का? किंवा त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का? पोहोचत असतील तर त्या कशा राबविल्या जातात? ग्रामपंचायतीला येणाºया निधीचा पुरेपूर उपयोग केला जातो का? हासुद्धा महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणून शासनाने वेळीच दखल घेऊन या समस्यांवर निश्चित उपाय शोधणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. जो पर्यंत शासनाच्या योजना गरजूंपर्यत जाणार नाही तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरील ओझ उतरणार नाही हेही निश्चित आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरState Governmentराज्य सरकारWomenमहिलाFamilyपरिवारCylinderगॅस सिलेंडर