शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 17:21 IST

७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन सरपण डोक्यावर आणतात

ठळक मुद्देमांगनेवाडीत गॅस ना रॉकेल : उज्ज्वल गॅस योजना २५ कुटुंबांपुरतीचअंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने तो करण्यासाठी खूप संघर्ष

मोहन लांडे - मढ :  मढ आणि जुन्नर गावापासून केवळ दहा किमी अंतरावर असणाऱ्या मांगनेवाडी या गावातील २५ कुटुंबे सोडली तर इतर सर्वच कुटुंबीयांना महिलांना घरातील चूल पेटविण्यासाठी डोईवर सरपण घेऊन पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही या गावात केवळ २५ घरांमध्ये गॅस कनेक्शन आले आहे, तर उर्वरित घरामध्ये चुलीचा धूर निघतो. या धुरात या गावाचा विकास अद्यापही हरवून गेलेला आहे. त्यामुळे टीचभर पोटाची भूक मिटविण्यासाठी येथील महिलांच्या डोईवर अजूनही सरपणाचा भार वाहावा लागतो.जुन्नरच्या बाजूला गणेशखिंडीच्या पायथ्याशी सह्याद्री डोंगररांगेतील  मांगणी डोंगराच्या कुशीत वसलेली ६५ ते ७० घरांची वस्ती म्हणजे मांगनेवाडी. आजही आदिवासी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपली उपजीविका चालविण्यासाठी अजूनही ७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन वाळलेले सरपण डोक्यावर आणताना त्यांना जिवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. स्वत:च्या घराची जागा सोडली तर सर्वच कुटुंबे ही भूमिहीन आहेत. शेतजमिनी नसल्याने मिळेल ते काम आणि मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. याशिवाय विशेष म्हणजे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठीसुद्धा अडचण निर्माण होते. अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने अनेकांच्या हातापाया पडून मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी खूप संघर्ष आणि यातना सहन कराव्या लागतात...............सरपण आणताना पडल्याने महिलांचा गेला जीवआदिवासी बांधवांच्या डोक्यावरील मोळी खाली कधी येणार, हादेखील आदिवासी भागातील एक ज्वलंत प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आजही डोक्यावर सरपण वाहत आपली उपजीविका करण्याचे काम आदिवासी बांधवांना करावे लागत आहे. मागील महिन्यात करंजाळे येथील महिला सीताबाई रोहिदास भांगले वय वर्षे ३६ सरपण आणण्यासाठी रानात गेली असता पाय घसरून पडली, डोक्यावरील मोळी अंगावर पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.........शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचावेत

शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ खरोखरच गरजू लाभार्थ्यांना मिळतो का? किंवा त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का? पोहोचत असतील तर त्या कशा राबविल्या जातात? ग्रामपंचायतीला येणाºया निधीचा पुरेपूर उपयोग केला जातो का? हासुद्धा महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणून शासनाने वेळीच दखल घेऊन या समस्यांवर निश्चित उपाय शोधणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. जो पर्यंत शासनाच्या योजना गरजूंपर्यत जाणार नाही तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरील ओझ उतरणार नाही हेही निश्चित आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरState Governmentराज्य सरकारWomenमहिलाFamilyपरिवारCylinderगॅस सिलेंडर