शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा धर्मनिरपेक्ष -आशा पारेख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:04 IST

आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले.

पुणे : आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले. या वेळी ‘द हिट गर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक खालिद मंहोमद आणि प्रकाशक अजय मागो, संमेलनाच्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते.आत्मचरित्राविषयी पारेख म्हणाल्या की, मी आजवर केवळ अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे; मात्र त्या व्यतिरिक्त इतरही खूप काही मी आयुष्यात केले. ते सर्व लोकांसमोर यावे, या हेतूनेच आत्मचरित्र लिहिण्याचे माझ्या मनात आले. एक अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त मी एक चित्रपट वितरण कंपनीदेखील चालविली आहे. सिनेआर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सेन्सॉर बोर्डावर काम केले आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे हॉस्पिटलदेखील चालविले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व पैलू यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहेत, याचा मला आनंद आहे़आपल्या आवडीचा सहकलाकार कोणता, या प्रश्नावर त्यांनी शम्मी कपूर असे उत्तर दिले. ते माझ्या पहिल्या चित्रपटाचे हीरो होते आणि त्यांनी माझी कायमच काळजी घेतली. मी त्यांना गंमतीने कायमच चाचा म्हणायचे, ते त्यांनी नेहमीच खेळकर वृत्तीने घेतले. या वेळी दिलीप कुमार यांच्या बरोबर झालेल्या गैरसमजामुळे इतक्या मोठ्या प्रथितयश कलाकारा बरोबर काम करता आले नाही याचे दु:ख मनात कायम राहील, असे त्यांनी सांगितले.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये गेल्या तीन दिवसांत दिग्गज कलाकार आणि लेखकांनी हजेरी लावली व विविध विषयांवर आपली मते मांडली. यंदा ‘व्हॉइस आॅफ वूमेन’ ही संकल्पना असल्याने या विषयी झालेल्या चर्चा खूप रंगल्या.पुण्याशी माझे विशेष नातेपुण्याशी माझे विशेष नाते आहे. माझी आई फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायची, त्यामुळे वडील तिला भेटायला पुण्यात येत. त्यांनी तिला पुण्यातच लग्नासाठी मागणी घातली त्यानंतर १९४० मध्ये त्यांचे लग्न झाले. मी एफटीआयआयमध्ये शिकू शकले नाही, ही सल नेहमीच माझ्या मनात राहील. खरेतर मी असे मानते की, अभिनय हा शिकवता येत नाही, तो अंगभूत असावा लागतो; मात्र एफटीआयआयने आपल्या चित्रपटसृष्टीला खूप चांगले कलाकार आणि तंत्रज्ञ दिले. खरेतर मी एफटीआयआयची स्थापना होण्याआधीच चित्रपटसृष्टीत आले. लहान वयातच मिळालेल्या रंगभूमीच्या अनुभवामुळे चित्रपटसृष्टीत काम करणे मला सोपे झाले.

टॅग्स :Indiaभारत