शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा धर्मनिरपेक्ष -आशा पारेख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:04 IST

आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले.

पुणे : आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले. या वेळी ‘द हिट गर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक खालिद मंहोमद आणि प्रकाशक अजय मागो, संमेलनाच्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते.आत्मचरित्राविषयी पारेख म्हणाल्या की, मी आजवर केवळ अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे; मात्र त्या व्यतिरिक्त इतरही खूप काही मी आयुष्यात केले. ते सर्व लोकांसमोर यावे, या हेतूनेच आत्मचरित्र लिहिण्याचे माझ्या मनात आले. एक अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त मी एक चित्रपट वितरण कंपनीदेखील चालविली आहे. सिनेआर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सेन्सॉर बोर्डावर काम केले आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे हॉस्पिटलदेखील चालविले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व पैलू यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहेत, याचा मला आनंद आहे़आपल्या आवडीचा सहकलाकार कोणता, या प्रश्नावर त्यांनी शम्मी कपूर असे उत्तर दिले. ते माझ्या पहिल्या चित्रपटाचे हीरो होते आणि त्यांनी माझी कायमच काळजी घेतली. मी त्यांना गंमतीने कायमच चाचा म्हणायचे, ते त्यांनी नेहमीच खेळकर वृत्तीने घेतले. या वेळी दिलीप कुमार यांच्या बरोबर झालेल्या गैरसमजामुळे इतक्या मोठ्या प्रथितयश कलाकारा बरोबर काम करता आले नाही याचे दु:ख मनात कायम राहील, असे त्यांनी सांगितले.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये गेल्या तीन दिवसांत दिग्गज कलाकार आणि लेखकांनी हजेरी लावली व विविध विषयांवर आपली मते मांडली. यंदा ‘व्हॉइस आॅफ वूमेन’ ही संकल्पना असल्याने या विषयी झालेल्या चर्चा खूप रंगल्या.पुण्याशी माझे विशेष नातेपुण्याशी माझे विशेष नाते आहे. माझी आई फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायची, त्यामुळे वडील तिला भेटायला पुण्यात येत. त्यांनी तिला पुण्यातच लग्नासाठी मागणी घातली त्यानंतर १९४० मध्ये त्यांचे लग्न झाले. मी एफटीआयआयमध्ये शिकू शकले नाही, ही सल नेहमीच माझ्या मनात राहील. खरेतर मी असे मानते की, अभिनय हा शिकवता येत नाही, तो अंगभूत असावा लागतो; मात्र एफटीआयआयने आपल्या चित्रपटसृष्टीला खूप चांगले कलाकार आणि तंत्रज्ञ दिले. खरेतर मी एफटीआयआयची स्थापना होण्याआधीच चित्रपटसृष्टीत आले. लहान वयातच मिळालेल्या रंगभूमीच्या अनुभवामुळे चित्रपटसृष्टीत काम करणे मला सोपे झाले.

टॅग्स :Indiaभारत