शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत उत्सुकता; नागपूर की पुणे, याविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढतशुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका पोहोचतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे

पुणे : बडोदे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदावर मराठवाड्याचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाचे संमेलनाध्यक्षपद नागपूरकडे की पुण्याकडे याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. निवडणुकीच्या तोफा काहीशा थंडावल्यामुळे उमेदवारही मतांची समीकरणे आणि जुळवाजुळव करण्यात गुंतले असल्याचे चित्रही दिसत आहे. आयोजक संस्थेची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार संमेलनाध्यक्षपदाचा दावेदार ठरतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या मतपत्रिका एकगठ्ठा पद्धतीने न आल्याने ऐन वेळी ‘गेम चेंजर’ कोण ठरणार, हे पाहणे औैत्सुक्याचे ठरेल.९१व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी एकूण १०७० मतदार मतदान करणार असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७७५ मतपत्रिका आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अ‍ॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मराठवाडा साहित्य परिषदेने सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातील पुरोगामी संघटना, कार्यकर्त्यांनी राजन खान यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या पाठिंब्यामुळे रवींद्र शोभणे यांचे पारडे जड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद देशमुख यांच्यासाठी छुप्या पद्धतीने खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या मतदारांपैैकी ७० टक्के लोकांचा साहित्याशी दुरान्वये संबंध नसतो. साहित्य संस्थांचे पदाधिकारीही केवळ गटातटाचे राजकारण करण्यात मग्न असतात. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार असा थेट सामना झाला पाहिजे, असे मत एका उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

एकगठ्ठा मतपत्रिका आलेल्या नाहीत आयोजक संस्थेकडून यंदा एकगठ्ठा पद्धतीने मतपत्रिका आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मते कोणाच्या पारड्यात पडणार ही बाब गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांनी देशमुख यांना मतदान करावे, यासाठी फोनाफोनी झाल्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचतील.

 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेnagpurनागपूर