शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत उत्सुकता; नागपूर की पुणे, याविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढतशुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका पोहोचतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे

पुणे : बडोदे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदावर मराठवाड्याचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाचे संमेलनाध्यक्षपद नागपूरकडे की पुण्याकडे याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. निवडणुकीच्या तोफा काहीशा थंडावल्यामुळे उमेदवारही मतांची समीकरणे आणि जुळवाजुळव करण्यात गुंतले असल्याचे चित्रही दिसत आहे. आयोजक संस्थेची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार संमेलनाध्यक्षपदाचा दावेदार ठरतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या मतपत्रिका एकगठ्ठा पद्धतीने न आल्याने ऐन वेळी ‘गेम चेंजर’ कोण ठरणार, हे पाहणे औैत्सुक्याचे ठरेल.९१व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी एकूण १०७० मतदार मतदान करणार असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७७५ मतपत्रिका आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अ‍ॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मराठवाडा साहित्य परिषदेने सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातील पुरोगामी संघटना, कार्यकर्त्यांनी राजन खान यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या पाठिंब्यामुळे रवींद्र शोभणे यांचे पारडे जड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद देशमुख यांच्यासाठी छुप्या पद्धतीने खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या मतदारांपैैकी ७० टक्के लोकांचा साहित्याशी दुरान्वये संबंध नसतो. साहित्य संस्थांचे पदाधिकारीही केवळ गटातटाचे राजकारण करण्यात मग्न असतात. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार असा थेट सामना झाला पाहिजे, असे मत एका उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

एकगठ्ठा मतपत्रिका आलेल्या नाहीत आयोजक संस्थेकडून यंदा एकगठ्ठा पद्धतीने मतपत्रिका आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मते कोणाच्या पारड्यात पडणार ही बाब गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांनी देशमुख यांना मतदान करावे, यासाठी फोनाफोनी झाल्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचतील.

 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेnagpurनागपूर