शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत उत्सुकता; नागपूर की पुणे, याविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढतशुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका पोहोचतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे

पुणे : बडोदे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदावर मराठवाड्याचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाचे संमेलनाध्यक्षपद नागपूरकडे की पुण्याकडे याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. निवडणुकीच्या तोफा काहीशा थंडावल्यामुळे उमेदवारही मतांची समीकरणे आणि जुळवाजुळव करण्यात गुंतले असल्याचे चित्रही दिसत आहे. आयोजक संस्थेची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार संमेलनाध्यक्षपदाचा दावेदार ठरतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या मतपत्रिका एकगठ्ठा पद्धतीने न आल्याने ऐन वेळी ‘गेम चेंजर’ कोण ठरणार, हे पाहणे औैत्सुक्याचे ठरेल.९१व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी एकूण १०७० मतदार मतदान करणार असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७७५ मतपत्रिका आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अ‍ॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मराठवाडा साहित्य परिषदेने सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातील पुरोगामी संघटना, कार्यकर्त्यांनी राजन खान यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या पाठिंब्यामुळे रवींद्र शोभणे यांचे पारडे जड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद देशमुख यांच्यासाठी छुप्या पद्धतीने खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या मतदारांपैैकी ७० टक्के लोकांचा साहित्याशी दुरान्वये संबंध नसतो. साहित्य संस्थांचे पदाधिकारीही केवळ गटातटाचे राजकारण करण्यात मग्न असतात. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार असा थेट सामना झाला पाहिजे, असे मत एका उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

एकगठ्ठा मतपत्रिका आलेल्या नाहीत आयोजक संस्थेकडून यंदा एकगठ्ठा पद्धतीने मतपत्रिका आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मते कोणाच्या पारड्यात पडणार ही बाब गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांनी देशमुख यांना मतदान करावे, यासाठी फोनाफोनी झाल्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचतील.

 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेnagpurनागपूर