शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा परिसरात संचारबंदी; दोषींवर कारवाई : विश्वास नांगरे पाटील, शांततेचे जनतेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:10 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटत असून, कोरेगाव भीमा दुसऱ्या दिवशीही तणावाखालीच आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिकांना शांततेचे आवाहन केले.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, लोणी कंद, पेरणे या ठिकाणी पाळण्यात आला बंद १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाबाबत पुनर्विचार करावा : दीपक केसरकर

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटत असून, कोरेगाव भीमा दुसºया दिवशीही तणावाखालीच आहे. परिसरात संचारबंदी व जमावबंदी असून, आज सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांनी दाखविलेला संयम व स्थानिकांचे सहकार्य मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनीही दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देत स्थानिकांना शांततेचे आवाहन केले.दरम्यान, दुसऱ्या दिवशीही कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, लोणी कंद, पेरणे या ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. संचारबंदी असतानाही आज सकाळी एका गटाने गावामध्ये फेरी मारून काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी हा जमाव पांगविला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आली. कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे रूप आले असून, रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू आहे. संचारबंदीत कोणीही रस्त्यावर थांबू नये, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून दिल्या जात आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी गावामध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले असून, जातीय ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

...तर मोठा अनर्थ घडला असतापोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, की ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध लोकांचा यात बळी जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करून योग्य ती मदत मिळवून दिली जाईल.’ या वेळी पत्रकार परिषदेत ‘पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का?’ असा सवाल पत्रकारांनी केला असता वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

पंचनाम्यासाठी एसआयटी टीमकोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिला जाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDeepak Kesarkarदीपक केसरकर Puneपुणे