शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पुणे जिल्ह्यात बांबू शेतीतून होतेय कोट्यवधींची कमाई ; यंदा दोनशे हेक्टर लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 12:10 IST

जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय 

श्रीकिशन काळेपुणे : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतील बांबू तोड व विक्रीतून दरवर्षी सुमारे १५० कोटी रुपये या भागातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. तसेच तोड करणारे मजूर आणि वाहतूक करणाऱ्यांना देखील रोजगार मिळत आहे, अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक डॉ. हेमंत बेडेकर यांनी दिली. बांबू फक्त कापून विकण्याऐवजी त्यापासून विविध वस्तू, हस्तकलेतून वापर वाढविला तर कोट्यवधींची उलाढाल वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच यंदा दोनशे हेक्टर जिल्ह्यात नवीन लागवड झाली आहे.

वन सर्वेक्षणातील अंदाजानुसार सह्याद्रीच्या दोन्ही उतारावरील ८,९ जिल्ह्यात महाराष्ट्राला सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न मिळते. हे गेली अनेक वर्षे चालू आहे. हे उत्पन्न बांबू तोडून विकण्याने मिळते. याच बांबूचा जर व्यापारी उपयोग केला गेला किंवा काही प्रक्रिया केली गेली, तर हेच उत्पन्न काही हजार कोटींच्या घरात जाईल. दुर्दैवाने याकडे अजून कोणी पाहिले नाही. कोल्हापूर, सांगली, लोणंद, सासवड, पुणे या बाजारात अनेक दशके बांबूचा व्यवहार चालू आहे.राज्यात वाया गेलेल्या जमिनीवर बांबू लावला तर चांगले उत्पन्न होईल. काही शेतकरी एकत्र येऊन बांबूची शेती करून बायो-सीएनजी प्रकल्प टाकू शकतात. याला चांगली मागणी आहे, असे बेडेकर म्हणाले. बांबू लावल्यावर तीन-चार वर्षानंतर कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरवात होते. डोंगर उतारावर, माळरानावर लावता येते. 

--------------------------...तर राज्यात ५ हजार कोटींपर्यंत उलाढाल बांबूची पीक म्हणून लागवड, निगा व नियोजन केल्यास राज्यातील बांबू व्यापार सुमारे ५००० कोटींपर्यंत जाऊ शकतो. बांबूचे मार्केटिंग व्हायला हवे. तर यापासून चांगला कोळसा, दैनंदिन उपयोगातील ताट-वाटी, चमचे होऊ शकतात. प्लास्टिक ऐवजी हे वापरू शकतो. बांबूच्या वस्तूंचे लगेच विघटन होते. हाँटेलमध्ये पार्सलसाठी बांबूच्या बाँक्सचा वापर झाला पाहिजे. 

------------------------------

नदी प्रदूषणावरही बांबू उपयुक्तकुरकुंभ, शिरवळ, जेजुरी या व इतर ठिकाणी एमआयडीसी आहेत. त्यातील प्रदूषित पाणी थेट नदीत जाते. तेच पाणी एका ठिकाणी जमा करून तिथे बांबू लावला तर त्यातील प्रदूषित घटक बांबू शोषून घेईल आणि पाणी शुद्ध होईल. ते शुद्ध पाणी जमिनीत मुरल्यावर विहिरांना पाणी राहिल. असा उपक्रम राज्यभर व्हायला हवा, असे बेडेकर यांनी सांगितले. 

-------------------------------

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीbusinessव्यवसाय