शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वाहतूकदारांच्या संपामुळे कोटींचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2015 01:39 IST

देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे

पिंपरी : देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तीन लाख, तर देशभरात ८२ लाख गाड्या बंद आहेत. ट्रान्सपोर्टनगरमध्ये सुमारे ६०० ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिक दिवसाला ७ ते १० हजार रुपये उत्पन्न मिळवतात. या ट्रान्सपोर्ट कार्यालयामध्ये येणारी वाहने खाली करण्यासाठी व भरण्यासाठी असणाऱ्या हमालांची संख्या २ हजार इतकी आहे. प्रत्येक हमाल दिवसाला किमान ६०० रुपये मिळवितात. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन काँग्रेसने बेमुदत बंद पुकारल्याने या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वांचेच दररोजचे उत्पन्न बंद झाले आहे. ट्रकचे वाहक, क्लिनर, बुकिंग एजन्सी यांचे उत्पन्न या व्यवसायाला जोडलेले असते. याशिवाय वाहतूकनगरीतील चहा-नाष्टा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, टायर पंक्चर काढणारे, पानटपरीधारक या सर्वांनाच या बंदचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याचप्रमाणे शहरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांचेही वाहतूकदारांच्या बंदीमुळे नुकसान होत आहे. कच्चा माल आणण्यासाठी व तयार झालेला पक्का माल दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी गैरसोय होत आहे. लघुउद्योजक संघटना अध्यक्ष नितीन बनकर म्हणाले, ‘‘बंद पुकारल्यानंतर शनिवार, रविवार आल्याने काही विशेष फरक पडला नाही. शहरातील अनेक कंपन्या रविवारी बंद असतात. यामुळे फारशी अडचण भासली नाही.’’ (प्रतिनिधी)