शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पीक परवाना भ्रष्टाचाराला देईल निमंत्रण : तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:13 IST

शेतकऱ्यांना उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकासाठी परवाना घ्यावे लागणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभूजल अधिनियमाच्या मसूद्यावर नोंदविणार हरकतीविहीर आणि विंधन विहिरींच्या (बोअर वेल) खोलीवर ६० मीटरची २०० फूट मर्यादाविहिरींमधून शेती आणि उद्योगासाठी भूजल वापरल्यास त्यामार्फत महसूल विभागामार्फत कर बसविण्याची तरतूद

पुणे : भूजल अधिनियम मसुद्यात विहिरी आणि विंधन विहीरींच्या खोलीवर २०० फूटांची मर्यादा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, खोली मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारावी लागेल, तसेच विंधन विहिर यंत्र मालकाचे खोली वाढविण्यापासून हात बांधण्याचे मोठे आव्हान भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेवर असेल. शेतकऱ्यांना उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकासाठी परवाना घ्यावे लागणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. राज्याचा भूजल अधिनियम मसूदा हरकती आणि सूचनांसाठी सोमवारी (दि. ३१) खुला करण्यात आला. त्यानुसार विहीर आणि विंधन विहिरींच्या (बोअर वेल) खोलीवर ६० मीटरची (२०० फूट) मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी वगळता इतर विहिरींना त्यापेक्षा जास्त खोलीवर जाता येणार नाही. राज्यात १ हजार ५३१ पाणलोट क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, ७४ पाणलोट क्षेत्र अतिशोषित आहेत. तर, १०४ पाणलोट क्षेत्र त्याच मार्गावर जात आहेत. अशा शोषित क्षेत्रात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणीपूर्वी पाणलोट क्षेत्र जलसंपत्तीकडे अर्ज करावा लागेल, अशी तरतूद मसुद्यात आहे. याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या खोल विहिरींमधून शेती आणि उद्योगासाठी भूजल वापरल्यास त्यामार्फत महसूल विभागामार्फत कर बसविण्याची तरतूद आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी पावसाचा थेंब आणि थेंब जमिनीत मुरेल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. उसासारख्या अधिक पाणी घेणाऱ्या पिकासाठी ठिबक सिंचनवर लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्याची गरज आहे. त्यावर पिक परवाना घेणे हा उपाय असू शकत नाही. त्याने काही भूजल पातळीत वाढ होणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी म्हणाले. विहीर आणि विंधन विहिरींच्या खोलीवर दोनशे फुटांची मर्यादा घालण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्याची खोली मोजणार कशी.? याशिवाय विंधन विहीर खोदणाऱ्याने अधिक खोली करुन दिल्यास त्यावर लक्ष कसे ठेवणार. शिवाय विहिरींना नोंदणी प्रमाणपत्र देणे सुरु केल्यानंतर अनेकजण भविष्यात करणार असलेल्या विहिरींचे प्रमाणपत्र घेऊन ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल, असे मत निवृत्त वरिष्ठ भू वैज्ञानिक महेंद्र खरात यांनी व्यक्त केले.   ..............जास्त पाणी लागणाऱ्या  पिकासाठी परवानापद्धती आणणे चुकीचे आहे. त्यामुळे भ्रष्टाचारास चालना मिळेल. अशा प्रकारच्या निर्बंधातून भूजल पातळीत काही वाढ होणार नाही. त्यामुळे भूजल अधिनियमातील मसुद्याच्या तरतुदी विरोधात हरकत नोंदविण्यात येईल. राजू शेट्टी, खासदार आणि अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार