शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वृक्षतोडविरोधी कायद्यात गंभीर शिक्षेची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 3:22 AM

पाच जिल्ह्यांत तीन महिन्यात साडेपाच कोटी लागवड

पुणे : वृक्षतोडविरोधी कायद्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे असे अर्थमंत्री तथा वन, पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत मुनगंटीवार यांनी पुण्यात पुण्यासह ५जिल्ह्याची बैठक घेतली व तीन महिन्यात ५ कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले.

मुनगंटीवार म्हणाले, एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के वनआच्छादन असणे गरजेचे आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के आहे. ते वाढावे यासाठी सलग ४ वर्षांपासून वन विभाग वृक्षारोपणाची मोहिम पावसाळ्यापूर्वी काही महिने आधी राबवत आहे. त्यामुळे राज्याचे वन आच्छादन क्षेत्र २७३ चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्य सरकारने सन २०१७ ते २०१९ दरम्यान राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. २०१९ मध्ये १जुलै ते ३० सप्टेबर दरम्यान ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीपैकी वृक्ष जगण्याचे राज्यातील प्रमाण ८६ टक्के असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, नागपूर येथे एक कमांड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची सर्व अद्ययावत माहिती छायाचित्रांसहित दिसते. जुलै ते सप्टेंबर च्या वृक्षरोपण कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये वृक्षारोपणाचे सगळे नियोजन चुकलेले आहे, गरज नसताना वृक्षारोपण केले जात आहे असा आरोप माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी केला आहे. त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले,कोणी काहीही आरोप केले तरी वृक्षारोपण सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार