शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुलांना भाषेची गाेडी लावण्यासाठी आधी पालकांनी पुस्तक हातात घ्या : अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 20:13 IST

विवेक समुह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टी. बी. मुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या कार्यक्रमात रविवारी डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे : शिक्षक व पालकांसाठी साहित्य व मराठी भाषा हे जिव्हाळ्याचे विषय हवेत. पालक मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसल्यास मुलंही त्यातच रमतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असल्यास आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवे. भाषा, साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी पालकांना केले.

विवेक समुह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टी. बी. मुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या कार्यक्रमात रविवारी डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले,  माजी खासदार प्रदीप रावत, फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर लुल्ला, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य डॉ. अनिरूध्द देशपांडे, नितीन शेटे, साप्ताहिक विकेच्या संपादक अश्विनी मयेकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. अर्चना कुडतरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, मराठी शाळा, मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी शासनाने, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सगळ््यांची अपेक्षा असते. पण एक सामान्य माणूस, पालक म्हणून आपण आपल्या भाषेवर किती प्रेम करतो. या भाषेमध्ये किती बोलतो, किती वापर करतो? याचाही विचार करायला हवा. सर्वांनीच आपल्या भाषेकडे जागृतपणे पाहण्याची गरज आहे. प्रादेशिक भाषा वर्ष केवळ साजरे करून चालणार नाही. मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर पालक आणि शिक्षकांची भुमिका महत्वाची आहे. भाषेकडे जाणिवपुर्वक पाहायला हवे. पालकांनी पुस्तक हातात घेतले, मुलांशी संवाद साधला तर त्यांनाही गोडी लागले. त्यामुळे पालक व शिक्षकांनी मराठी भाषेकडे, बोली भाषांकडे प्रेमाने, जागृतपणे पाहणे आवश्यक आहे. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांमध्ये समन्वय असायला हवा. आपण समाजासाठी जेवढे करून तेवढे कमीच आहे. पण हे कार्य करत असताना आपले पाय नेहमी जमीनीवर हवेत, अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली. डॉ. कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले. लुल्ला यांनी संस्थेविषयी माहिती दिली.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेPuneपुणे