शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

गायीलाच दुधाने घातली अंघोळ, सर्वपक्षीय आंदोलनात उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.

भवानीनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. तालुक्यातील जाचकवस्ती येथे गायीलाच दुधाने आंघोळ घालुन सर्वपक्षीय कार्यकत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांना प्रतिलिटर सुमारे १० रुपये तोटा दूध धंद्यामध्ये सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत कोणी गंभीर नाही. वाढत्या तोट्यामुळे शेतकरी अडचणीत चालला आहे, असे मत यावेळी जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी मांडले. शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलीटर ५ रुपये अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला.यावेळी संग्रामसिंह निंबाळकर, प्रकाश नेवसे, राहुल जगताप, सिद्धार्थ जाचक, अमरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे आदींनी सहभाग घेतला.>बोबडेमळा येथे दूध दरवाढीसाठी आंदोलनसुपे : पानसरेवाडी (ता. बारामती) अंतर्गत असणाºया बोबडेमळा येथील शेतकºयांनी दूधदरवाढीसाठी तीव्र आंदोलन केले. राज्यशासनाने दुधाचे दर त्वरित वाढवावे, यासाठी बोबडेमळा येथील शेतकºयांनी आक्रमक होऊन दूध खाली ओतून दिले.येथील शेतकरी मागील दोन दिवसांपासून दूध आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येथील शेतकºयांना पावसाअभावी जनावरांचा चारा विकत घ्यावा लागत आहे. चाºयाचा सध्या बाजारभाव २ हजार ५०० रुपयेप्रतिटन आहे.जनावरांच्या संगोपनासह सर्व हिशोब केला तर दररोज चार जनावरांच्या मागे ४०० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती तात्यासाहेब काळखैरे, लव्हाजी काळखैरे, नवनाथ काळखैरे, संतोष काळखैरे यांनी दिली. सरकारने आता तरी शेतकºयांचा अंत पाहू नये. दुधाला प्रतिलिटर २७ रुपये बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.>भिलारवाडीत शेतकºयांची दुधाने अंघोळकाºहाटी : भिलारवाडी येथे दुधाने अंघोळ करीत शेतकºयांनी दूधदरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकºयाच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीला समर्थन म्हणून भिलारवाडी परिसरामध्ये दूध संकलन न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले. बारामती तालुक्यातील भिलारवाडी जळगाव कडेपठार परिसरामध्ये शेतकºयांनी दूध संकलन केंद्रावर दूध न घालण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सक्रिय केले आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दूध घालणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे केंद्रावर संकलन झाले नाही. जिवापाड सांभाळलेली जनावरे शेतकºयांना जगवावी लागत आहेत. पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि त्यातच दुधाला बाजारभाव नाही. जगायचं तर कसं जगायचं, आता नाही मग कधीच नाही, म्हणून आम्ही सगळे जण एकत्र येऊन दूध न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे भिलारवाडीचे शेतकरी सुनील भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.