शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गायीलाच दुधाने घातली अंघोळ, सर्वपक्षीय आंदोलनात उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.

भवानीनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. तालुक्यातील जाचकवस्ती येथे गायीलाच दुधाने आंघोळ घालुन सर्वपक्षीय कार्यकत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांना प्रतिलिटर सुमारे १० रुपये तोटा दूध धंद्यामध्ये सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत कोणी गंभीर नाही. वाढत्या तोट्यामुळे शेतकरी अडचणीत चालला आहे, असे मत यावेळी जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी मांडले. शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलीटर ५ रुपये अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला.यावेळी संग्रामसिंह निंबाळकर, प्रकाश नेवसे, राहुल जगताप, सिद्धार्थ जाचक, अमरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे आदींनी सहभाग घेतला.>बोबडेमळा येथे दूध दरवाढीसाठी आंदोलनसुपे : पानसरेवाडी (ता. बारामती) अंतर्गत असणाºया बोबडेमळा येथील शेतकºयांनी दूधदरवाढीसाठी तीव्र आंदोलन केले. राज्यशासनाने दुधाचे दर त्वरित वाढवावे, यासाठी बोबडेमळा येथील शेतकºयांनी आक्रमक होऊन दूध खाली ओतून दिले.येथील शेतकरी मागील दोन दिवसांपासून दूध आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येथील शेतकºयांना पावसाअभावी जनावरांचा चारा विकत घ्यावा लागत आहे. चाºयाचा सध्या बाजारभाव २ हजार ५०० रुपयेप्रतिटन आहे.जनावरांच्या संगोपनासह सर्व हिशोब केला तर दररोज चार जनावरांच्या मागे ४०० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती तात्यासाहेब काळखैरे, लव्हाजी काळखैरे, नवनाथ काळखैरे, संतोष काळखैरे यांनी दिली. सरकारने आता तरी शेतकºयांचा अंत पाहू नये. दुधाला प्रतिलिटर २७ रुपये बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.>भिलारवाडीत शेतकºयांची दुधाने अंघोळकाºहाटी : भिलारवाडी येथे दुधाने अंघोळ करीत शेतकºयांनी दूधदरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकºयाच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीला समर्थन म्हणून भिलारवाडी परिसरामध्ये दूध संकलन न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले. बारामती तालुक्यातील भिलारवाडी जळगाव कडेपठार परिसरामध्ये शेतकºयांनी दूध संकलन केंद्रावर दूध न घालण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सक्रिय केले आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दूध घालणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे केंद्रावर संकलन झाले नाही. जिवापाड सांभाळलेली जनावरे शेतकºयांना जगवावी लागत आहेत. पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि त्यातच दुधाला बाजारभाव नाही. जगायचं तर कसं जगायचं, आता नाही मग कधीच नाही, म्हणून आम्ही सगळे जण एकत्र येऊन दूध न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे भिलारवाडीचे शेतकरी सुनील भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.