शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:09 IST

शरद पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी देशातील मंदीविषयी भाष्य केले.

बारामती :  देशात आताचा काळ फार अडचणीचा आहे, मंदीचे संकट आहे. गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही. सामान्य माणसाची बाजारातून खरेदी करण्याची ताकत जोपर्यंत वाढत नाही. तोपर्यंत व्यापार वाढणार नाही. व्यापार उद्योग वाढल्याशिवाय मंदीचे संकट दूर होणार नाही. मंदीचे संकट आल्यावर अनेक क्षेत्राला त्याची किंमत चुकवावी लागते, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.

बारामती येथील विविध विकासकामांचे पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मागे दहा वर्ष केंद्रीय कृषिमंत्रालयाचे कामकाज पाहताना देशातील बाजार समित्या आपल्या अंतर्गत कार्यरत होत्या. त्यावेळी साहजिकच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताची जपणुक करता येईल, त्याने पिकविलेला माल देशाच्या बाहेर नेणारा व्यापारी तयार करण्याची खबरदारी घेतली. त्याचे परीणाम शेतकऱ्यांच्या संसारावर दिसले.

आज भारतामध्ये चारचाकी गाडी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपार ५ लाख पेक्षा अधिक कर्मजाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. केवळ चारचाकी क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात हे चित्र आहे. त्यातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदीच्या संकटामुळे बेरोेजगारीचे प्रमाण वाढल्यास अनेकांच्या हाताला काम राहणार नाही. यामध्ये खर्चात कपात करा.पण लोकांच्या हातचे काम काढु नका, असे आवाहन पवार यांनी केले.

संबंध मराठवाड्यात दुष्काळाचे संकट आहे. कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात महापुराचे संकट आले. त्यामुळे सोन्यासारखी पिके हातातुन गेली. अनेकांची घरे पडली. सार्वजनिक वास्तुचे नुकसान झाले, रस्ते वाहुन गेले. चोहोबाजुला सगळे घटक संकटात आले. तर दुसऱ्या बाजुला दुष्काळ असल्याने त्याचा परीणाम व्यापार आणि व्यवहारावर होतो. शेतीमालाच्या किंमतीवर परीणाम होतो, बाजारपेठेवर होतो.संकटाच्या दृष्टचक्रातुन आपण  जातो, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणेPoliticsराजकारण