शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:09 IST

शरद पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी देशातील मंदीविषयी भाष्य केले.

बारामती :  देशात आताचा काळ फार अडचणीचा आहे, मंदीचे संकट आहे. गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही. सामान्य माणसाची बाजारातून खरेदी करण्याची ताकत जोपर्यंत वाढत नाही. तोपर्यंत व्यापार वाढणार नाही. व्यापार उद्योग वाढल्याशिवाय मंदीचे संकट दूर होणार नाही. मंदीचे संकट आल्यावर अनेक क्षेत्राला त्याची किंमत चुकवावी लागते, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.

बारामती येथील विविध विकासकामांचे पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मागे दहा वर्ष केंद्रीय कृषिमंत्रालयाचे कामकाज पाहताना देशातील बाजार समित्या आपल्या अंतर्गत कार्यरत होत्या. त्यावेळी साहजिकच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताची जपणुक करता येईल, त्याने पिकविलेला माल देशाच्या बाहेर नेणारा व्यापारी तयार करण्याची खबरदारी घेतली. त्याचे परीणाम शेतकऱ्यांच्या संसारावर दिसले.

आज भारतामध्ये चारचाकी गाडी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपार ५ लाख पेक्षा अधिक कर्मजाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. केवळ चारचाकी क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात हे चित्र आहे. त्यातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदीच्या संकटामुळे बेरोेजगारीचे प्रमाण वाढल्यास अनेकांच्या हाताला काम राहणार नाही. यामध्ये खर्चात कपात करा.पण लोकांच्या हातचे काम काढु नका, असे आवाहन पवार यांनी केले.

संबंध मराठवाड्यात दुष्काळाचे संकट आहे. कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात महापुराचे संकट आले. त्यामुळे सोन्यासारखी पिके हातातुन गेली. अनेकांची घरे पडली. सार्वजनिक वास्तुचे नुकसान झाले, रस्ते वाहुन गेले. चोहोबाजुला सगळे घटक संकटात आले. तर दुसऱ्या बाजुला दुष्काळ असल्याने त्याचा परीणाम व्यापार आणि व्यवहारावर होतो. शेतीमालाच्या किंमतीवर परीणाम होतो, बाजारपेठेवर होतो.संकटाच्या दृष्टचक्रातुन आपण  जातो, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणेPoliticsराजकारण