शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:09 IST

शरद पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी देशातील मंदीविषयी भाष्य केले.

बारामती :  देशात आताचा काळ फार अडचणीचा आहे, मंदीचे संकट आहे. गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही. सामान्य माणसाची बाजारातून खरेदी करण्याची ताकत जोपर्यंत वाढत नाही. तोपर्यंत व्यापार वाढणार नाही. व्यापार उद्योग वाढल्याशिवाय मंदीचे संकट दूर होणार नाही. मंदीचे संकट आल्यावर अनेक क्षेत्राला त्याची किंमत चुकवावी लागते, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.

बारामती येथील विविध विकासकामांचे पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मागे दहा वर्ष केंद्रीय कृषिमंत्रालयाचे कामकाज पाहताना देशातील बाजार समित्या आपल्या अंतर्गत कार्यरत होत्या. त्यावेळी साहजिकच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताची जपणुक करता येईल, त्याने पिकविलेला माल देशाच्या बाहेर नेणारा व्यापारी तयार करण्याची खबरदारी घेतली. त्याचे परीणाम शेतकऱ्यांच्या संसारावर दिसले.

आज भारतामध्ये चारचाकी गाडी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपार ५ लाख पेक्षा अधिक कर्मजाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. केवळ चारचाकी क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात हे चित्र आहे. त्यातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदीच्या संकटामुळे बेरोेजगारीचे प्रमाण वाढल्यास अनेकांच्या हाताला काम राहणार नाही. यामध्ये खर्चात कपात करा.पण लोकांच्या हातचे काम काढु नका, असे आवाहन पवार यांनी केले.

संबंध मराठवाड्यात दुष्काळाचे संकट आहे. कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात महापुराचे संकट आले. त्यामुळे सोन्यासारखी पिके हातातुन गेली. अनेकांची घरे पडली. सार्वजनिक वास्तुचे नुकसान झाले, रस्ते वाहुन गेले. चोहोबाजुला सगळे घटक संकटात आले. तर दुसऱ्या बाजुला दुष्काळ असल्याने त्याचा परीणाम व्यापार आणि व्यवहारावर होतो. शेतीमालाच्या किंमतीवर परीणाम होतो, बाजारपेठेवर होतो.संकटाच्या दृष्टचक्रातुन आपण  जातो, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणेPoliticsराजकारण