शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धोकादायक वाडे खाली करण्याची जबाबदारी पालिकेने टाकली पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:58 IST

पावसाळ्यात धोकादायक वाडे पडून त्यात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने हे वाडे खाली करुन ते पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते़..

ठळक मुद्देकाही अडचण आल्या तर आवश्यकतेनुसार पोलीस बळ उपलब्ध करुन देण्यात येईलमहापालिका दुर्लक्ष करुन पोलिसांवर सर्व जबाबदारी टाकू पहात असल्याचे पोलिसांचे म्हणणे

पुणे : पावसाळ्यात धोकादायक वाडे पडून त्यात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने हे वाडे खाली करुन ते पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते़. मात्र, या वाड्यात राहणाऱ्यांची पर्यायी सोय करुन न देता महापालिकेने हे वाडे खाली करण्याची सर्व जबाबदारी शहर पोलीस दलावर टाकून आपण नामानिराळे राहण्याचा पवित्रा घेतला आहे़. त्यावर पोलिसांनी तेथील लोकांना पुनर्वसन करतेवेळी काही अडचण आल्या तर आवश्यकतेनुसार पोलीस बळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असे उत्तर पोलिसांकडून महापालिकेला देण्यात आले़ त्यानंतर महापालिकेकडून कोणतेही पाऊल न उचलल्याने हा प्रश्न अजूनच तसाच लोबकळत पडला आहे़. रविवारी पेठेतील भांडी आळीतील जुना वाडा मंगळवारी सकाळी पडला़ सुदैवाने त्यात कोणी राहत नसल्याचे जीवितहानी झाली नाही़.महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ७ अंतर्गत सदाशिव पेठेपासून भवानी, नाना पेठेपर्यंतचा परिसर येतो़.  याबाबत या कार्यालयाने १४ जून २०१९ रोजी विश्रामबाग, फरासखाना, खडक पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून उच्च न्यायालयाने धोकादायक वाडे खाली करुन त्यांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे, त्यानुसार कार्यवाही करावी, असा शासन आदेश काढला होता़. त्यावर बोट ठेवून महापालिका वाडे खाली करण्यापासून नामानिराळी राहू पहात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़. मात्र, याच परिपत्रकात वाडे रिकामे करण्यापूर्वी महापालिकेच्या इमारतींमध्ये रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी, असे म्हटले आहे़. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करुन पोलिसांवर सर्व जबाबदारी टाकू पहात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़. या पत्राला पोलिसांनी अशा धोकादायक वाड्यात राहणाऱ्या सर्व लोकांचे पर्यायी पुनर्वसन आपल्या यंत्रणेमार्फत करण्यात यावे़. त्यात काही अडचण आली तर पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास आवश्यकेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल, असे महापालिकेला कळविले आहे़. पुण्याच्या मध्य वस्तीत महापालिकेच्या सर्व्हेनुसार साधारण ३१६ जुने वाडे, इमारती आहेत़. या जुन्या जीर्ण झालेल्या इमारती, वाड्यांबाबत महापालिकेने सर्व्हे करुन त्यांची वर्गवारी करणे अपेक्षित आहे़. त्यात सी १ : अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य, तात्काळ निष्कासित करणे, सी २ ए : इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे, प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या , सी २ बी : इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या, सी ३ : इमारतीची किरकोळ दुरुस्ती प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या या प्रकारात वर्गवारी करावी़. सी १ या प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या इमारतींना महानगरपालिका अधिनियमानुसार नोटीस बजावून इमारत निष्कासित करावी़. इमारती रिकाम्या करण्यापूर्वी त्यामधील भाडेकरु, सदनिकाधारक यांचे असलेले चटई क्षेत्रफळ मोजून त्याप्रमाणे प्रत्येक भाडेकरु, सदनिकाधारक, सहकारी संस्था यांना प्रमाणपत्र द्यावे़ इमारती निष्कासित करताना अडथळा आला तर विद्युत जोडणी व पाणी तोडावे, असे सुचविले आहे़. .............शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिकेने अतिधोकादायक, व इतर प्रवर्गात किमी वाडे मोडतात, त्याचे सर्व्हे केला आहे का ? वाड्यातील रहिवाशांच्या पर्यायी निवाऱ्याची काय सोय केली, या वाड्यांच्या संदर्भात न्यायालयात काही दावे सुरु आहेत का? याची काहीही माहिती पोलिसांना दिली नसून केवळ धोकादायक बांधकामाची यादी पोलिसांना सोपविली आहे़. पोलिसांकडे रहिवाशांच्या पर्यायी निवाऱ्याची काहीही सोय नाही व ते करु शकत नाही़ महापालिका सर्व पोलिसांवर टाकून जबाबदारी झटकून टाकत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस