शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला जायचेच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:45 IST

‘कोरोना बहुत ही स्वाभिमानी है, वो तब तक आपके घर नही आएगा जब तक आप उसे लेने खुद बाहर नही निकलते’..

ठळक मुद्देप्रत्येकाने संकल्प करावा : सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्या, गर्दी टाळा, स्वच्छता पाळा सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर

प्रज्ञा केळकर-सिंग - पुणे : ‘कोरोना बहुत ही स्वाभिमानी है, वो तब तक आपके घर नही आएगा जब तक आप उसे लेने खुद बाहर नही निकलते’, असा संदेश सध्या सोशल मीडियावर पसरतो आहे. सध्या भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दुसºया टप्प्यावर आहे. पहिल्या टप्प्यात परदेशातून आलेले नागरिक, दुसऱ्या टप्प्यात बाधित किंवा संशयितांच्या संपर्कात आलेले नागरिक, तर तिसऱ्या टप्प्यात स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपल्याला तिसऱ्या टप्प्यात जायचे नाही, असा संकल्प प्रत्येक नागरिकाने आता करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जनतेला आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या भारतीय व्यक्तींना आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.तिसºया टप्प्यात देशातील व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. संसर्ग झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर आपल्याला तिसºया टप्प्याला सामोरे जावे लागेल आणि त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होईल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे, गर्दीची ठिकाणे टाळण्याची प्रत्येकाने स्वत:वर सक्ती करुन घ्यावी, शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्त अवलंबावी, यासाठी आवाहन केले जात आहे. चीननंतर इटली, जर्मनी, इराण यांसारख्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वेगाने वाढला आहे. सध्या आपण दुसºया टप्प्यावर असल्याने तिथेच प्रसार रोखणे गरजेचे असते. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत..........परदेशातून आलेल्या लोकांचे तातडीने विलगीकरण केले जात आहे. आवश्यक ती सर्व काळजी यंत्रणेकडून घेतली जात असली तरी वैयक्तिक पातळीवर सतर्क राहणे जास्त गरजेचे आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये हाताचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे सातत्याने हात धूत राहणे, हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. आताच काळजी न घेतल्यास रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकेल. त्यामुळे विनाकारण प्रवास टाळा, शक्यतो घराबाहेर पडू नका .- डॉ. मोहन जोशी,माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.............तिसºया टप्प्यामध्ये कोरोनाचा संसर्ग एका स्थानिक व्यक्तीकडून दुसºया स्थानिक व्यक्तीला होऊ शकतो. तिसºया टप्प्यात रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यामुळे सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’वर प्राधान्याने भर देण्याची गरज आहे. ‘गेट टुगेदर’ टाळणे, जास्त लोकांनी एकत्र न येणे, घरातही स्वच्छता पाळणे, सतत हात धूत राहणे यावर भर देण्याची गरज आहे. ही काळजी घेतल्यास संसर्गाचा वेग मंदावता येऊ शकतो आणि तिसºया टप्प्यातील धोका टळू शकतो.- डॉ. प्राची साठे, आयसीयू विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका