शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

CoronaVirus News : चाचण्यांची क्षमता खूप, प्रमाण मात्र अद्याप कमीच- डॉ. रमण गंगाखेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 01:07 IST

सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात जास्तीत जास्त चाचण्या व्हायलाच हव्यात, यात दुमत नाही. अजूनही चाचण्या करण्याची आपली खूप क्षमता आहे. पण पहिल्या दिवसापासून आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केलेला नाही. सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. लक्षणे असलेल्या व संपर्कातील व्यक्तींनी पुढे यावे. न घाबरता चाचणी करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. गंगाखेडकर म्हणाले, बाहेर फिरणे, अनेक लोकांच्या संपर्कात येणे हे संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आहे. हे प्रमाण किती आहे, कुणी सांगु शकत नाही. आता पुण्यात लॉकडाऊन लावले, याचा विचार आडाख्यांमध्ये केला जात नाही. ही गंभीर आरोग्य समस्या बनल्याने १० लाख किंवा ५० लाख लोकांना लागण झाली काय, याने फरक पडणार नाही. अशा परिस्थतीत आपल्याला किती संसर्ग होऊ शकतो, याचा विचार करून त्यावर नियंत्रण आणणे जरुरीचे आहे.दहा दिवसांनी चाचणीन करणे योग्यचसध्याची रुग्णसंख्या पाहता आपल्याकडे खाटांची संख्या पुरेशी आहे. पण खाटा कमी पडतील, अशी वेळ येऊ शकते. आपण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवत आहोत. घरी सोडण्याचे धोरणही बदलत आहोत. दहा दिवसांनी चाचणी न करता रुग्णांना घरी सोडले जात आहे. या रुग्णांची चाचणी केली तर ‘आरटी पीसीआर’मध्ये रुग्णाच्या शरीरात विषाणू असल्याचे दिसते. ते जिवंत आहेत की नाही, हे कळत नाही. सर्वसाधारणपणे लक्षणे सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी शरीरातील विषाणू मृत झालेला असतो. पण चाचणीमध्ये त्याचे अस्तित्व दिसते. त्यामुळे ससंंर्ग होण्याचा धोका नाही.हर्ड इम्युनिटीची वाट पाहायला नकोसामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी किमान ६० लोकसंख्येला संसर्ग व्हावा लागेल. तेवढ्या लोकसंख्येमध्ये मृतांचा आकडा खूप मोठा असेल. हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीचा विचार करणेही चुकीचे ठरेल. संसर्ग होऊ नये, म्हणूनच दक्षता घ्यायला हवी.कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मर्यादासुरूवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने बाधित व्यक्तीचे संपर्क शोधणे शक्य होत होते. रुग्णसंख्या वाढत असताना हे शोधणे कठीण असते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे धोरण आपण बदललेले नाही. ते करणे आजही अपेक्षित आहे. समजा पाच हजार लोकांना लागण झाली असेल तर घरी पाठवायला तेवढे मनुष्यबळही हवे. यासाठी समाजाने, सामाजिक संस्थांनी पुढे यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस