शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

CoronaVirus News : चाचण्यांची क्षमता खूप, प्रमाण मात्र अद्याप कमीच- डॉ. रमण गंगाखेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 01:07 IST

सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात जास्तीत जास्त चाचण्या व्हायलाच हव्यात, यात दुमत नाही. अजूनही चाचण्या करण्याची आपली खूप क्षमता आहे. पण पहिल्या दिवसापासून आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केलेला नाही. सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. लक्षणे असलेल्या व संपर्कातील व्यक्तींनी पुढे यावे. न घाबरता चाचणी करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. गंगाखेडकर म्हणाले, बाहेर फिरणे, अनेक लोकांच्या संपर्कात येणे हे संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आहे. हे प्रमाण किती आहे, कुणी सांगु शकत नाही. आता पुण्यात लॉकडाऊन लावले, याचा विचार आडाख्यांमध्ये केला जात नाही. ही गंभीर आरोग्य समस्या बनल्याने १० लाख किंवा ५० लाख लोकांना लागण झाली काय, याने फरक पडणार नाही. अशा परिस्थतीत आपल्याला किती संसर्ग होऊ शकतो, याचा विचार करून त्यावर नियंत्रण आणणे जरुरीचे आहे.दहा दिवसांनी चाचणीन करणे योग्यचसध्याची रुग्णसंख्या पाहता आपल्याकडे खाटांची संख्या पुरेशी आहे. पण खाटा कमी पडतील, अशी वेळ येऊ शकते. आपण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवत आहोत. घरी सोडण्याचे धोरणही बदलत आहोत. दहा दिवसांनी चाचणी न करता रुग्णांना घरी सोडले जात आहे. या रुग्णांची चाचणी केली तर ‘आरटी पीसीआर’मध्ये रुग्णाच्या शरीरात विषाणू असल्याचे दिसते. ते जिवंत आहेत की नाही, हे कळत नाही. सर्वसाधारणपणे लक्षणे सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी शरीरातील विषाणू मृत झालेला असतो. पण चाचणीमध्ये त्याचे अस्तित्व दिसते. त्यामुळे ससंंर्ग होण्याचा धोका नाही.हर्ड इम्युनिटीची वाट पाहायला नकोसामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी किमान ६० लोकसंख्येला संसर्ग व्हावा लागेल. तेवढ्या लोकसंख्येमध्ये मृतांचा आकडा खूप मोठा असेल. हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीचा विचार करणेही चुकीचे ठरेल. संसर्ग होऊ नये, म्हणूनच दक्षता घ्यायला हवी.कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मर्यादासुरूवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने बाधित व्यक्तीचे संपर्क शोधणे शक्य होत होते. रुग्णसंख्या वाढत असताना हे शोधणे कठीण असते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे धोरण आपण बदललेले नाही. ते करणे आजही अपेक्षित आहे. समजा पाच हजार लोकांना लागण झाली असेल तर घरी पाठवायला तेवढे मनुष्यबळही हवे. यासाठी समाजाने, सामाजिक संस्थांनी पुढे यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस