शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:52 IST

डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

- राजानंद मोरेपुणे : जगभरात कोरोना विषाणुला रोखण्यासाठी औषधे व लसींच्या चाचण्या सुरू असताना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी योगामधील ‘जलनेती’मुळे कोरोना विषाणुला दूर ठेवू शकत असल्याचा दावा केला आहे.‘मागील तीन महिन्यांपासून नियमित जलनेती करणाऱ्या सहाशेवर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. जलनेतीने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा दावा नाही. मात्र संसर्गाची शक्यता कमी होते’, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक  निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.‘लोकमत’ला माहिती देताना डॉ. केळकर म्हणाले, मी साडे चार वर्षांपासून जलनेती करत आहे. कधीही संसर्ग होऊन सर्दी किंवा फ्लुची लक्षणे आढळली नाहीत. तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे रुग्णालयातील १२०० डॉक्टर व इतर कर्मचाºयांपैकी ६०० जण दिवसातून दोनदा जलनेती करत आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता आदी दक्षता घेतली जाते. या काळात त्यातील एकालाही कोरोना फ्लुची किंवा कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. जलनेती न करणारे अन्य ६०० जण तसेच रुग्णालयातील इतर १८०० जणांपैकी २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे होती. हा तुलनात्मक अभ्यास आणखी तीन महिने सुरू राहील. नंतर हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार आहे.जलनेती कोणीही करू शकते1जलनेतीमुळे नाकामध्ये सतत ओलावा राहतो. नाक स्वच्छ होऊन विषाणुंचा भार कमी होतो. नाक कोरडे पडले तर संसर्गाची शक्यता अधिक वाढते. नाकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जलनेती केली जाते.2बायपास, अस्थमा किंवा अन्य आजार असलेले तसेच जलनेतीचे पात्र व्यवस्थितपणे धरू शकणारे कोणीही जलनेती करू शकतात. माझे ९२ वर्षांचे वडील दीड महिन्यांपासून जलनेती करत आहेत, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली. ... तर ठरेल गेमचेंजरपुढील तीन महिन्यांतील निष्कर्षामधून जलनेतीचा प्रभावीपणे परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास हे महत्वपूर्ण संशोधन ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असा आशावाद डॉ. केळकर यांनी व्यक्त केला. जलनेतीचे तोटे नाहीत. शक्य आहे ते करू शकतील, यासाठी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यdocterडॉक्टर