शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Corona virus : पोलिसांनी काढला ६३१ कोरोना रुग्णांचा माग, पोलिसी चातुर्याला तंत्रज्ञानाची जोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:04 IST

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि क्वारंटाईन या त्रिसूत्री वरच कोरोनावर मात करता येते.

विवेक भुसेपुणे : पोलीसी चातुर्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन पुण्यात गेल्या तीनमहिन्यांत तब्बल ६३१ कोरोना रुग्णांचा माग काढण्यात आला. या सर्वांचे वेळीच विलगिकरण केले गेल्याने इतरांना होणार संसर्ग टळला.कोरोनाविरुध्दच्या लढाईत बाधितांची वेळीच माहिती मिळणे सर्वात महत्वाचे असते. ट्रेसींग-टेस्टींग आणि क्वारंटाईन या त्रिसूत्रीवरच ही लढाई जिंकता येते. मात्र, एखादा नागरिक कोरोनाबाधित आढळल्यावर मधल्या काळात अनेकांना भेटलेला असतो. त्याच्यामुळे  किती जणांना संसर्ग झाला हे शोधणे महापालिकेला अवघड जात होते़ मात्र, पुणे  शहर पोलीसांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी खास पथक तयार केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, मच्छिद्र पंडित यांच्यासह २० जणांचे पथक स्थापन केले आहे. महापालिकेकडून रुग्ण निष्पन्न झाल्यावर त्याचा नाव, पत्ता पोलीसांना पाठविला जातो.मोबाइल क्रमांकावरून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले जाते़ हा रुग्ण मागील पाच दिवसांत कोठे फिरला, कोणाच्या  संपर्कात आला असेल याची माहिती गोळा केली. प्रसंगी संबंधित रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्याची खातरजमा केली जाते. रुग्णाच्या संपर्कात आलेले व ज्यांना त्याच्यापासून संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, अशांच्या माहितीचा अहवाल महापालिकेला पाठविला जातो. या माहितीतून आतापर्यंत तब्बल ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतनाही, अशा ३ हजार लोकांची माहिती पुढे आली आहे.पोलिसांचे हे पथक दिवसभर कार्यरत असते. माहितीचे विश्लेषण करून  कोणत्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे़ त् याचा अहवाल महापालिकेला दिला जातो. त्यामुळे संभावित कंटेन्मेंट झोनची रचना करणेही शक्य  होते.आतापर्यंत पोलिसांच्या या पथकाने ३३ हजार ५०२ लोकांची माहिती पुरविली असल्याचे मोराळे यांनी सांगितले.पोलीस म्हणतात, यामुळे पसरतो कोरोना शहरातील अनेक भागांत विशेषत: झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. या पथकाने केलेल्या विश्लेषणात त्याची अनेक कारणेसमोर आली आहे़ त्यात प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये सर्वांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणे, त्याला व्हेंटिलेशन नसणे, रात्री एकत्र गप्पा मारत बसणे, याचबरोबर आणखी एक कारण समोर आले ते म्हणजे कोणताही कामधंदा नसल्याने तरुण मुले, ज्येष्ठांनी एकत्र बसून पत्ते खेळणे हे कारण आढळून आले आहे. एकत्र पत्ते खेळत असल्याने पत्ते वाटताना ते तोंडात बोट घालतात,तेच पत्ते दुसरे हातात घेताना त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचेआढळून आले आहे.त्यावर मोबाइल टॉयलेट वापरण्याची सूचना या पथकाने महापालिकेला केली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीबाबत केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याने येथील कोरोना संसर्ग थांबविण्यात यश आले असल्याचे या अधिकायानेसांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस