शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Corona virus : बालेवाडी क्वारंटाईन सेंटरमधील २५ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:53 IST

बालेवाडी गावात २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़.

ठळक मुद्देज्या भागात कोरोनाचा संसर्ग नाही तेथे कोरोनाबाधित रूग्ण ठेवण्याची गरज काय ?

पुणे : बालेवाडी गावात २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़. तो अत्यंत चुकीचा असून, या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी एकही रूग्ण बाणेर-बालेवाडी येथील भागातील नागरिक नाही. तर बालेवाडी येथे पालिकेने सुरू केलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील आहे.     शहरी भागातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणच्या ज्या व्यक्तींना सौम्य लक्षणे आढळून आली, अशा साडेतीनशे व्यक्तींना बालेवाडी येथील निकमार कॉलेजमध्ये क्वारंटाईन (विलगीकरण कक्षात ) सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची तपासणी करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ३३ जणांचे अहावाल हे पॉझिटिव्ह आले असून, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  या सर्वांचे तपासणीचे अहवाल सध्या प्राप्त होत असून, जसे अहवाल प्राप्त होतील तसे त्यांना पालिकेच्या पॅनेलवरील अन्य खाजगी रूग्णालयात कोव्हिड-१९ च्या उपचारासाठी हलविण्याचे काम सध्या सुरू आहे.     पुणे महापािलकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील दाटवस्ती भागात सर्वेक्षणाचे काम सुरू असून यामध्ये सौम्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना निकमान कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. या सर्वांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, जस-जसे अहवाल प्राप्त होत आहे. तसे पॉझिटिव्ह रूग्णांना अन्यत्र हलविण्यात येत आहे.     जे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत ते या क्वारंटाईन सेंटरमधीलच आहे. बाणेर-बालेवाडी अथवा परिसरातील एकही व्यक्ती यामध्ये नाही़ त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. निकमार कॉलेज येथे २२ एप्रिल पासून शहरातील दाटवस्ती भागातील कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यात येत असून, त्यांच्या तपासणीचे काम चालू आहे़ प्रशासनाने या भागात अन्य नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. ज्या भागात कोरोनाचा संसर्ग नाही तेथे कोरोनाबाधित रूग्ण ठेवण्याची गरज काय ?पुणे शहरात एकीकडे चार पेक्षा अधिक वार्डांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे बाणेर-औध या भागात कोरोनाचा एक रूग्ण महिनाभरापूर्वी आढळून आला आसताना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही़. त्यामुळे ज्या भागात कोरोनाचा एकही रूग्ण किंवा संशयितही नाही त्या भागात कोरोना बाधितांच्या किंवा संशयितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे चुकीचे आहे अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत़     औंध-बाणेर व कोथरूड- बावधान या दोन्ही वार्डात विशेषत: बालेवाडी भागात आत्तापर्यंत फिजिकल डिस्टसिंग पाळले गेले़ तसेच येथील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालनही मोठ्या प्रमाणात केल्याने, या भागात कोरोनाचा एकही रूग्ण सापडला असताना त्याचा इतरांना संसर्ग झाला नाही.अशा बालेवाडीत निकमार कॉलेजमध्ये कोरोनाबाधितांना आणून कोरोनाचा संसर्ग या भागात वाढण्याची दाट शक्यता आहे. जो भाग शासनाच्या निकषाप्रमाणे ग्रीन झोन आहे. तेथे इतर भागातील रूग्ण ठेऊन तो भितीच्या छायेखाली ठेवणे योग्य नाही. कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळावे, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा ही सर्वांचीच भूमिका आहे. परंतू, विनाकारण संसर्ग नसलेल्या भागाला विशेषत: बालेवाडी गावाला वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे हे क्वारंटाईन सेंटर या ठिकाणाहून हलवावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

 

टॅग्स :BalewadiबालेवाडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका