शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Corona virus : विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच सहकार्य अपेक्षित, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:23 IST

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीवरुन होत असलेल्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या.

पुणे - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मत मांडले. पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीवरुन होत असलेल्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या. थोड्या उशिरा किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं, असेही अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत. कारण निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातून तर प्रचार होऊ शकत नाही, असे रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच, कडक निर्बंधासंदर्भातही नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

राज्यात यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. नियमांचे पालन नाही केले तर कोरोना होतो. ॲान-बेड मिळाला नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या. याबद्दलचा प्रयत्न करणं सरकारचं काम आहे. मात्र, सद्य परिस्थितीत तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तरी काही करता येणार नाही, असे पत्रकारांना उद्देशून अजित पवार म्हणाले. तसेच, कोणाचा जीव जावा असं कोणाला वाटतं का? राज्यात शेतकरी आत्महत्या होवू नये म्हणूनही प्रयत्न करत होतो. आता, राज्यात कोरोना बाधितांचे जीव वाचले पाहिजेत. तसेच, कोणी कोरोनाबाधित होवू नये यासाठीचा हा कडक निर्बंध आणि प्रयत्न सुरू असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

विकेंड लॉकडाऊनला म्हणजेच शनिवार आणि रविवारी नागरिकांनी पूर्ण प्रतिसाद दिला, त्याचे अजित पवार यांनी कौतुक केले. मागच्या लॅाकडाउनला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, त्याला प्रतिसाद दिला नाही. तर, संपूर्ण लॅाकडाऊन लावावा लागेल, असा इशारीही अजित पवार यांनी दिला आहे.  पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच, दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, मी राजकीय बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सीन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

ससूनमधील निवासी डॉक्टरांच्या संपावर भाष्य करताना अजित पवार  म्हणाले, ससूनच्या निवासी डॉक्टरांनो सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील. ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या