शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 13:06 IST

सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य

ठळक मुद्देभारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थितीलॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यतासेल्फ क्वॉरंटाईन हाच मौलिक उपाय

धनाजी कांबळे - पुणे : चीनमधून सुरुवात झालेला कोरोनाचा विषाणू जगभर पोचेल असे वाटत नव्हते. मात्र, सरकारने सुरुवातीला काही देशांमधून आपल्या लोकांना मायदेशी आणले. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यातून संसर्गाचे प्रमाणे वाढले. चीनमध्ये मात्र, स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच भारतातही सेल्फ क्वारंटाईन हाच मौलिक उपाय असल्याचे चीनमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नागरिक मिलिंद उजळंबकर यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.कोरोना विषाणू कधी कुठे प्रवेश करेल, याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता देशोदेशी पोहचणाऱ्या या विषाणूचे भारतातही एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही चिंतेची बाब असल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आणि सरकारी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चीनमधील वुहान शहरात साधारण ७५ दिवस लॉकडाऊन होते. या शहरातून बाहेरच्या शहरात विषाणूचा प्रसार होणार नाही, असे कटाक्षाने बघितले. त्यामुळे जवळच असणाऱ्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी आणि तुलनेने नियंत्रणात आहे. आजही हाँगकाँगमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे स्वयंशिस्त आणि स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे हेच यावरचे महत्त्वाचे औषध आहे. चीनमध्ये आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी ज्या ज्या ठिकाणांहून संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे, असे भाजीमार्केट किंवा इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा आणि काळजी घेतली जात आहे, असे उजळंबकर यांनी सांगितले.सरकारने एक अ‍ॅप डेव्हलप केले होते. त्याच्या आधारे कुणालाही ६०० स्क्वेर फुटापेक्षा अधिक लांब जाता येत नव्हते. तसे केल्यास तत्काळ सरकारला मेसेज जात होता. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हे अ‍ॅप तयार करण्यात आले होते. त्यानुसार संशयिताच्या हातात एक पट्टी बांधली जात होती. तसेच त्याच्या मोबाईलमघ्ये हे अ‍ॅप डाउनलोड केले जात. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जवळपास कोणी कोरोनाबाधित असल्यास संबंधिताला त्याची माहिती मिळत होती. तसेच सरकारी आरोग्य यंत्रणेला देखील अलर्ट केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

भारतीयांनी काळजी घ्यावी...आता भारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थिती आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संसगार्तून या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. लॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सर्वांनी स्वयंशिस्त आणि सेल्फ क्वॉरंटाईनचे महत्त्व लक्षात घेऊन काळजी घ्यावी, असे आवाहनही मिलिंद उजळंबकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार