शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 13:06 IST

सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य

ठळक मुद्देभारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थितीलॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यतासेल्फ क्वॉरंटाईन हाच मौलिक उपाय

धनाजी कांबळे - पुणे : चीनमधून सुरुवात झालेला कोरोनाचा विषाणू जगभर पोचेल असे वाटत नव्हते. मात्र, सरकारने सुरुवातीला काही देशांमधून आपल्या लोकांना मायदेशी आणले. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यातून संसर्गाचे प्रमाणे वाढले. चीनमध्ये मात्र, स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच भारतातही सेल्फ क्वारंटाईन हाच मौलिक उपाय असल्याचे चीनमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नागरिक मिलिंद उजळंबकर यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.कोरोना विषाणू कधी कुठे प्रवेश करेल, याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता देशोदेशी पोहचणाऱ्या या विषाणूचे भारतातही एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही चिंतेची बाब असल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आणि सरकारी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चीनमधील वुहान शहरात साधारण ७५ दिवस लॉकडाऊन होते. या शहरातून बाहेरच्या शहरात विषाणूचा प्रसार होणार नाही, असे कटाक्षाने बघितले. त्यामुळे जवळच असणाऱ्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी आणि तुलनेने नियंत्रणात आहे. आजही हाँगकाँगमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे स्वयंशिस्त आणि स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे हेच यावरचे महत्त्वाचे औषध आहे. चीनमध्ये आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी ज्या ज्या ठिकाणांहून संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे, असे भाजीमार्केट किंवा इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा आणि काळजी घेतली जात आहे, असे उजळंबकर यांनी सांगितले.सरकारने एक अ‍ॅप डेव्हलप केले होते. त्याच्या आधारे कुणालाही ६०० स्क्वेर फुटापेक्षा अधिक लांब जाता येत नव्हते. तसे केल्यास तत्काळ सरकारला मेसेज जात होता. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हे अ‍ॅप तयार करण्यात आले होते. त्यानुसार संशयिताच्या हातात एक पट्टी बांधली जात होती. तसेच त्याच्या मोबाईलमघ्ये हे अ‍ॅप डाउनलोड केले जात. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जवळपास कोणी कोरोनाबाधित असल्यास संबंधिताला त्याची माहिती मिळत होती. तसेच सरकारी आरोग्य यंत्रणेला देखील अलर्ट केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

भारतीयांनी काळजी घ्यावी...आता भारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थिती आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संसगार्तून या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. लॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सर्वांनी स्वयंशिस्त आणि सेल्फ क्वॉरंटाईनचे महत्त्व लक्षात घेऊन काळजी घ्यावी, असे आवाहनही मिलिंद उजळंबकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार