शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Coronavirus| लसीकरणामुळे पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:49 IST

मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. दुसऱ्या लाटेत बहुसंख्य रुग्णांना श्वसनाचा त्रास झाला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. पण, तिसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसत नाहीत. विषाणूमधील बदल आणि लसीकरण यामुळे तिसरी लाट सध्यातरी सौम्य असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाल्याने तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात भरती होण्याचे, तीव्र लक्षणांचे प्रमाण कमी आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये बेशिस्त वर्तन कायम असल्याची बाब तज्ज्ञांनी अधोरेखित केली.

पहिली लाट : मार्च ते सप्टेंबर २०२०

सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २४.८६ टक्के

दुसरी लाट : फेब्रुवारी ते मे २०२१

सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २६ टक्के

तिसरी लाट : डिसेंबर शेवटच्या आठवड्यास सुरुवात

संभाव्य पॉझिटिव्हिटी रेट : २८ ते ३० टक्के

२०२१ मधील स्थिती :

सर्वात कमी रुग्णसंख्या - ९८ (२५ जानेवारी)

सर्वाधिक रुग्णसंख्या - ७०१० (८ एप्रिल)

सर्वात कमी सक्रिय रुग्ण - १३८३ (७ फेब्रुवारी)

सर्वाधिक सक्रिय रुग्ण - ५६६३६ (१८ एप्रिल)

पहिल्या लाटेमध्ये कोरोना विषाणू आपल्यासाठी पूर्णतः नवीन होता. त्यामुळे उपाययोजना करताना आरोग्य यंत्रणाही गोंधळलेली होती. मृत्युदरही काहीसा जास्त होता. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला. बहुतांश रुग्णांना तीव्र संसर्गाचा सामना करावा लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, स्टेरॉइड्स यांचा तुटवडा जाणवला, आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण निर्माण झाला. तिसरी लाट ही दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण झाली आहे. ८० टक्के ओमायक्रॉन आणि २० टक्के डेल्टा असे प्रमाण अपेक्षित आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक अनुभवायला मिळेल आणि नंतर तिसरी लाट ओसरू लागेल. यादरम्यान रुग्णसंख्येचे प्रमाण वाढले आणि त्यातील १ टक्का रुग्णांना हॉस्पिटलची गरज भासली तरी आरोग्य यंत्रणेला पुन्हा सज्ज राहावे लागणार आहे. लसीकरण बऱ्यापैकी झाले असल्याने यंदा रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

पहिल्या लाटेमध्ये कोरोनाबाबत कोणतेही संशोधन नव्हते. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटली. मात्र मृत्युदर आणि रुग्णसंख्या रोखण्यास तो यशस्वी ठरला. पहिल्या लाटेतून शासन आणि नागरिकांनीही धडा न घेतल्याने मोठा फटका बसला. आरोग्य यंत्रणेची तयारीही कमी पडल्याने प्रचंड ताण निर्माण झाला. तिसऱ्या लाटेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली आहे. त्यामुळे मृत्युदर कमी राहील, लसीकरणामुळेही मोठा हातभार लागला आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये नागरिकांचे बेशिस्त वर्तन कायम राहिले आहे. नियम न पाळल्याने आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य