शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:06 IST

आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या

पुणे : भूकंप, ढगफुटी, धरणफुटी तसेच प्लेग, कॉलरासारखी साथ यासारख्या आपत्तींंना पाठीवर टाकून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरीला शेकडो वर्षांहून अधिक काळ न चुकता गेलेल्या आषाढी वारीची वाट यंदा कोरोनाने अडविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालखी सोहळ्यांचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पादुका आषाढी वारीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला पंढरपूरला नेण्यासाठी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने घेऊन जाण्याचे पर्याय ठेवण्यात आले, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पायी वारी नाही गेली तरी ‘माऊली’ची श्रीविठ्ठलाशी गळाभेट अशा प्रकारे घडविली जाणार आहे.आषाढी वारी म्हणजे, आनंदे नाचत पंढरीशी जाणारा वैष्णवांचा महामेळा! हा मºहाटी संस्कृतीचा ठेवा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ‘वारी चुकू न दे हरी!’ ही समस्त वारकरी संप्रदायाची भावना होती. 

350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला नेली. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली, अशी मााहिती जाणकारांनी दिली.

50 हून अधिक पालख्या दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्या महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात असतात.

1889 मध्ये प्लेगचा कहर झाला होता तेव्हा वारी निघाली नाही. नंतर १९१८मध्ये फ्लूची मोठी साथ होती, तेव्हाही वारी निघाली नव्हती. मात्र, याबाबत देहू, आळंदी किंवा पंढरपूरमध्ये कसलीही नोंद उपलब्ध नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर