शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:06 IST

आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या

पुणे : भूकंप, ढगफुटी, धरणफुटी तसेच प्लेग, कॉलरासारखी साथ यासारख्या आपत्तींंना पाठीवर टाकून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरीला शेकडो वर्षांहून अधिक काळ न चुकता गेलेल्या आषाढी वारीची वाट यंदा कोरोनाने अडविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालखी सोहळ्यांचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पादुका आषाढी वारीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला पंढरपूरला नेण्यासाठी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने घेऊन जाण्याचे पर्याय ठेवण्यात आले, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पायी वारी नाही गेली तरी ‘माऊली’ची श्रीविठ्ठलाशी गळाभेट अशा प्रकारे घडविली जाणार आहे.आषाढी वारी म्हणजे, आनंदे नाचत पंढरीशी जाणारा वैष्णवांचा महामेळा! हा मºहाटी संस्कृतीचा ठेवा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ‘वारी चुकू न दे हरी!’ ही समस्त वारकरी संप्रदायाची भावना होती. 

350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला नेली. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली, अशी मााहिती जाणकारांनी दिली.

50 हून अधिक पालख्या दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्या महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात असतात.

1889 मध्ये प्लेगचा कहर झाला होता तेव्हा वारी निघाली नाही. नंतर १९१८मध्ये फ्लूची मोठी साथ होती, तेव्हाही वारी निघाली नव्हती. मात्र, याबाबत देहू, आळंदी किंवा पंढरपूरमध्ये कसलीही नोंद उपलब्ध नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर