शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बायको मेली एकाची, दावा मात्र तिघांचा! ५० हजारांसाठी काहीपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:49 IST

जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच...

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे; परंतु हे ५० हजार रुपये लाटण्यासाठी सर्वच नातेवाईक सरसावले असून, एका मयत व्यक्तीसाठी तीन-चार नातेवाईकांकडून अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून, नक्की अर्ज कुणाचा मंजूर करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये ज्या व्यक्तीचा अर्ज पहिला असेल तो अर्ज मंजूर करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजारांची मदत मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ६६७ वर जाऊन पोहोचली आहे तर कोरोनामुळे नोकरी गेली, कामधंदे नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या केलेल्या नागरिकांची संख्यादेखील बरीच असू शकते.

या सर्वांच्या वारसांना अखेर शासनाची मदत मिळणार आहे. शासनाचे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आतापर्यंत तब्बल २८ हजार ९०२ अर्ज केले आहेत. यापैकी तब्बल १९ हजार ३६० अर्ज मंजूर करण्यात आले असून, ९३९० अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या अर्जावर सुनावणी घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

या कारणांमुळे नाकारले अर्ज-

जिल्ह्यात तब्बल २८ हजार ९०२ पेक्षा अधिक लोकांनी ५० हजार रुपयांचे अनुदानासाठी अर्ज केले आहेत; परंतु अनेक अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केले नाहीत. पुण्याची व्यक्ती पण मृत्यू दुसऱ्या राज्यात झाला, कोरोनानंतर ३० पेक्षा अधिक कालावधीनंतर मृत्यू झाल्याने अशा विविध कारणांनी अर्ज नामंजूर होत आहेत.

जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी हाच उद्देश-

जिल्ह्यात तब्बल २९ हजार लोकांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत १९ हजार पेक्षा अधिक लोकांचे अर्ज मंजूर केले आहेत. नामंजूर झालेल्या अर्जाची सुनावणी घेऊन हे अर्ज देखील मंजूर करण्यात येणार आहे.

- विठ्ठल बनोटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस