शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बायको मेली एकाची, दावा मात्र तिघांचा! ५० हजारांसाठी काहीपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:49 IST

जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच...

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे; परंतु हे ५० हजार रुपये लाटण्यासाठी सर्वच नातेवाईक सरसावले असून, एका मयत व्यक्तीसाठी तीन-चार नातेवाईकांकडून अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून, नक्की अर्ज कुणाचा मंजूर करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये ज्या व्यक्तीचा अर्ज पहिला असेल तो अर्ज मंजूर करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजारांची मदत मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ६६७ वर जाऊन पोहोचली आहे तर कोरोनामुळे नोकरी गेली, कामधंदे नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या केलेल्या नागरिकांची संख्यादेखील बरीच असू शकते.

या सर्वांच्या वारसांना अखेर शासनाची मदत मिळणार आहे. शासनाचे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आतापर्यंत तब्बल २८ हजार ९०२ अर्ज केले आहेत. यापैकी तब्बल १९ हजार ३६० अर्ज मंजूर करण्यात आले असून, ९३९० अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या अर्जावर सुनावणी घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

या कारणांमुळे नाकारले अर्ज-

जिल्ह्यात तब्बल २८ हजार ९०२ पेक्षा अधिक लोकांनी ५० हजार रुपयांचे अनुदानासाठी अर्ज केले आहेत; परंतु अनेक अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केले नाहीत. पुण्याची व्यक्ती पण मृत्यू दुसऱ्या राज्यात झाला, कोरोनानंतर ३० पेक्षा अधिक कालावधीनंतर मृत्यू झाल्याने अशा विविध कारणांनी अर्ज नामंजूर होत आहेत.

जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी हाच उद्देश-

जिल्ह्यात तब्बल २९ हजार लोकांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत १९ हजार पेक्षा अधिक लोकांचे अर्ज मंजूर केले आहेत. नामंजूर झालेल्या अर्जाची सुनावणी घेऊन हे अर्ज देखील मंजूर करण्यात येणार आहे.

- विठ्ठल बनोटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस