शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कोरेगाव भीमा घटना सुनियोजित, शोध समितीचा दावा, पोलीस अधीक्षकांना देणार घटनेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 01:35 IST

कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाºया १० जणांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता.समितीने शिक्रापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, पेरणे, वढू आदी गावांमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यावर प्राप्त माहितीच्या आधारे अहवाल तयार केला असून, सोमवारी (दि.२२) तो पोलीस अधीक्षकांना दिला जाणार आहे.धेंडे म्हणाले, कोरेगाव भीमा घटना हा दलित विरूध्द मराठा या समाजातील संघर्ष नाही. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.आम्ही या घटनेशी संबंधित अनेकांशी संवाद साधला. त्यांचे सुमारे ५०० फोटो, व्हिडीओ आणिआॅडिओ संकलित केले. त्यातून हापूर्व नियोजित कट होता.हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. लहान मुलांचे भांडण झाले, तरी दलित वस्तीवर हल्लाहोऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथे तत्काळ सामाजिक सलोख्याचे वातावरण करण्याची गरज आहे.मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे या कटात सहभागी असल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते, असा दावा प्रा. कांबळे यांनी केला.समाधीचे शुद्धिकरण केले?केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर, काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी समाधीचे शुद्धिकरण केले, अशी माहिती शोध समितीला मिळाल्याचा दावा डॉ. धेंडे यांनी केला.नुकसानग्रस्तांनी भरपाई देणार -जिल्हाधिकारी सौरभ रावकोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी कौतुकाची थाप दिली. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत, श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी राव यांनी पाहणी केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव