शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

एल्गार परिषद वाद : शरजिल उस्मानीला म्हणायचे होते मनूवादी, बी जे कोळसे पाटील यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:20 IST

एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदूंविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : शरजिल उस्मानी याला मनुवादी म्हणायचे होते, त्याऐवजी त्याने हिंदू शब्द प्रयोग केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी म्हटले आहे.एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजिल उस्मानीचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदू धर्माविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.एल्गार परिषदेचे आयोजन निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याबाबत कोळसे पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद ही मनुवाद, मनीवादाच्या विरोधात संघर्ष करीत आलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे राजकारणाचे प्रमुख मुद्दे व्हावेत. धार्मिक, मंदिराबाबतचे मुद्द्यांवर राजकारण करु नये, असे म्हणणे आहे. सामान्य माणसाच्या गरजेचे प्रश्न राजकारणात प्रमुख स्थानी यावेत, अशी आमची भूमिका आहे.

एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखलशरजिल उस्मानी या २३ वर्षाच्या तरुणाचे संपूर्ण भाषण ऐकावे. आम्ही आजवर ब्राम्हण्यवादाविरोधात संघर्ष करीत आलो आहे. तामिळनाडुतील ब्राम्हणवादाविरोधातील लढाई उस्मानी याला माहिती नाही. तो शब्दाचा वापर करताना चुकला. त्याला मनूवादी म्हणायचे होते. त्याचे भाषण सुरु असताना आपल्याला हे लक्षात आले नाही. नाही तर तेव्हाच आपण त्या शब्दावर आक्षेप घेतला असता. गेले चार दिवस आमची बदनामी सुरु आहे. तेव्हा आपण गप्प बसलो होतो.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करासर्वोच्च न्यायालयानेही हिंदू हा धर्म नाही तर आचरणपद्धती असल्याचे म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विविध पुस्तकांमधून त्यांची हिंदू धर्माविषयी जे काही म्हटले आहे. त्यावर आपली जाहीर चर्चा करायची तयारी आहे. उस्मानी याच्या वक्तव्यावरून कोण भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न कोळसे पाटील यांनी उपस्थित केला.

एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी: जितेंद्र आव्हाड

टॅग्स :PuneपुणेHinduहिंदूMuslimमुस्लीम