शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

जुलमी पद्धतीने सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना ...

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजबिल भरले आहे त्यांच्यावर विद्युतरोहित्र बंद करून जाणीवपुर्वक अन्याय करत आहे.

कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा. एन उन्हाळ्यात पोटच्या पोरा प्रमाणे जपलेली पिके विज पूरवठा बंद केल्यामुळे डोळ्या देखत जळताना शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. विज वितरणला शासनाने आदेश दिले आहेत की थकबाकीदारांचे कनेक्शन बंद करा म्हणून परंतू विज वितरण कंपनीने कोणताही अधिकार नसताना ग्राहक हक्क कायद्याविरोधात डायरेक ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. याचा नाहक त्रास बिलभरलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर वर जर विस शेतकरी असले तर यापैकी पाच शेतकऱ्यांचे बिल भरलेले असले तरी त्याला यात भरडले जात आहे. बिल रिडींग नुसार न येता कर्मचारी १००% वसूलीचा तगादा लावत आहेत तसे न केल्यास तात्पुरता चालू केलेला डीपी आठदिवसात परत लगेच बंद केला जात आहे. मौजे बेलवाडी येथी एक ७५ वर्षाचे शेतकरी दोन वेळा ५ हजार रूपये बिल भरून देखील महिनाभरापासून विजवीतरन कंपनीत हेलपाटे मारावे लागत आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांना विद्युतरोहित्र सोडवण्या संदर्भात वरिष्ठांचे लेखी आदेश नसताना देखील वसूली साठी सर्रास विद्युतरोहित्र सोडवले जात आहेत ते तातडीने न थांबल्यास महावितरण अधिकऱ्यांना काळे फासून कार्यालयात कोंडून ठेवले जाईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला. यावेळी संबधित शेतकऱ्याचा विजपुरवठा चालू करून देण्यात आला व परिसरातील बंद विद्युतरोहित्रचा आढावा घेऊन ते चालू करण्यासाठी सूचना करण्याचे तोंडी आश्वासन वालचंदनगर कार्यालयाचे मुख्य अभियंता सूळ यांनी दिले.

--

चौकट १

अल्पभूधारक भरडला जातोय

--

महावितरण कडून शेतीपंपाची विजजोड तोडणी सुरू आहे. यामुळे काही भागातील बड्या शेतकयांनी तसेच गावपुढाऱ्यांनी राजकीय वजनाचा वापर करीत गावठाणच्या सिंगल फेज विद्युतरोहित्रा वर शेतीपंपाची जोडणी केली आहे. यामध्ये फक्त सर्वसामान्य तसेच अल्पभुधारक शेतकरी भरडला जात आहे. याची सर्व कल्पना महावितरण अधिकाऱ्यांना असताना देखील तेरी- भी चुप अन मेरी-भी चुप असा खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या इंदापूरच्या पश्चिम भागात पहावयास मिळत आहे.

------------------------