शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

जुलमी पद्धतीने सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना ...

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजबिल भरले आहे त्यांच्यावर विद्युतरोहित्र बंद करून जाणीवपुर्वक अन्याय करत आहे.

कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा. एन उन्हाळ्यात पोटच्या पोरा प्रमाणे जपलेली पिके विज पूरवठा बंद केल्यामुळे डोळ्या देखत जळताना शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. विज वितरणला शासनाने आदेश दिले आहेत की थकबाकीदारांचे कनेक्शन बंद करा म्हणून परंतू विज वितरण कंपनीने कोणताही अधिकार नसताना ग्राहक हक्क कायद्याविरोधात डायरेक ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. याचा नाहक त्रास बिलभरलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर वर जर विस शेतकरी असले तर यापैकी पाच शेतकऱ्यांचे बिल भरलेले असले तरी त्याला यात भरडले जात आहे. बिल रिडींग नुसार न येता कर्मचारी १००% वसूलीचा तगादा लावत आहेत तसे न केल्यास तात्पुरता चालू केलेला डीपी आठदिवसात परत लगेच बंद केला जात आहे. मौजे बेलवाडी येथी एक ७५ वर्षाचे शेतकरी दोन वेळा ५ हजार रूपये बिल भरून देखील महिनाभरापासून विजवीतरन कंपनीत हेलपाटे मारावे लागत आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांना विद्युतरोहित्र सोडवण्या संदर्भात वरिष्ठांचे लेखी आदेश नसताना देखील वसूली साठी सर्रास विद्युतरोहित्र सोडवले जात आहेत ते तातडीने न थांबल्यास महावितरण अधिकऱ्यांना काळे फासून कार्यालयात कोंडून ठेवले जाईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला. यावेळी संबधित शेतकऱ्याचा विजपुरवठा चालू करून देण्यात आला व परिसरातील बंद विद्युतरोहित्रचा आढावा घेऊन ते चालू करण्यासाठी सूचना करण्याचे तोंडी आश्वासन वालचंदनगर कार्यालयाचे मुख्य अभियंता सूळ यांनी दिले.

--

चौकट १

अल्पभूधारक भरडला जातोय

--

महावितरण कडून शेतीपंपाची विजजोड तोडणी सुरू आहे. यामुळे काही भागातील बड्या शेतकयांनी तसेच गावपुढाऱ्यांनी राजकीय वजनाचा वापर करीत गावठाणच्या सिंगल फेज विद्युतरोहित्रा वर शेतीपंपाची जोडणी केली आहे. यामध्ये फक्त सर्वसामान्य तसेच अल्पभुधारक शेतकरी भरडला जात आहे. याची सर्व कल्पना महावितरण अधिकाऱ्यांना असताना देखील तेरी- भी चुप अन मेरी-भी चुप असा खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या इंदापूरच्या पश्चिम भागात पहावयास मिळत आहे.

------------------------