शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

जुलमी पद्धतीने सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना ...

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजबिल भरले आहे त्यांच्यावर विद्युतरोहित्र बंद करून जाणीवपुर्वक अन्याय करत आहे.

कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा. एन उन्हाळ्यात पोटच्या पोरा प्रमाणे जपलेली पिके विज पूरवठा बंद केल्यामुळे डोळ्या देखत जळताना शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. विज वितरणला शासनाने आदेश दिले आहेत की थकबाकीदारांचे कनेक्शन बंद करा म्हणून परंतू विज वितरण कंपनीने कोणताही अधिकार नसताना ग्राहक हक्क कायद्याविरोधात डायरेक ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. याचा नाहक त्रास बिलभरलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर वर जर विस शेतकरी असले तर यापैकी पाच शेतकऱ्यांचे बिल भरलेले असले तरी त्याला यात भरडले जात आहे. बिल रिडींग नुसार न येता कर्मचारी १००% वसूलीचा तगादा लावत आहेत तसे न केल्यास तात्पुरता चालू केलेला डीपी आठदिवसात परत लगेच बंद केला जात आहे. मौजे बेलवाडी येथी एक ७५ वर्षाचे शेतकरी दोन वेळा ५ हजार रूपये बिल भरून देखील महिनाभरापासून विजवीतरन कंपनीत हेलपाटे मारावे लागत आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांना विद्युतरोहित्र सोडवण्या संदर्भात वरिष्ठांचे लेखी आदेश नसताना देखील वसूली साठी सर्रास विद्युतरोहित्र सोडवले जात आहेत ते तातडीने न थांबल्यास महावितरण अधिकऱ्यांना काळे फासून कार्यालयात कोंडून ठेवले जाईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला. यावेळी संबधित शेतकऱ्याचा विजपुरवठा चालू करून देण्यात आला व परिसरातील बंद विद्युतरोहित्रचा आढावा घेऊन ते चालू करण्यासाठी सूचना करण्याचे तोंडी आश्वासन वालचंदनगर कार्यालयाचे मुख्य अभियंता सूळ यांनी दिले.

--

चौकट १

अल्पभूधारक भरडला जातोय

--

महावितरण कडून शेतीपंपाची विजजोड तोडणी सुरू आहे. यामुळे काही भागातील बड्या शेतकयांनी तसेच गावपुढाऱ्यांनी राजकीय वजनाचा वापर करीत गावठाणच्या सिंगल फेज विद्युतरोहित्रा वर शेतीपंपाची जोडणी केली आहे. यामध्ये फक्त सर्वसामान्य तसेच अल्पभुधारक शेतकरी भरडला जात आहे. याची सर्व कल्पना महावितरण अधिकाऱ्यांना असताना देखील तेरी- भी चुप अन मेरी-भी चुप असा खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या इंदापूरच्या पश्चिम भागात पहावयास मिळत आहे.

------------------------