शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

एकाच अध्यक्षांवर चालणार ग्राहक मंचाचे कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 07:05 IST

ग्राहक मंचाचे गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्षांची नियुक्ती नसल्याने रेंगाळलेले कामकाज अखेर सुरू होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा मंचाला ३ तर अतिरीक्त जिल्हा मंचाला ५ महिने नव्हते अध्यक्ष तक्रारदार ग्राहकांना काहीसा दिलासाकॅम्पमध्ये असलेल्या ग्राहक न्यायालयात एकूण दोन न्यायालय (मंच) जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज आता महिन्यातून एक आठवडा चालणारदावा दाखल करण्यासाठी व तारीख मिळण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी

सनील गाडेकर पुणे : सेवा पुुरवठादारांकडून होणा-या फसवणुकीबाबत दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक मंचाचे गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्षांची नियुक्ती नसल्याने रेंगाळलेले कामकाज अखेर सुरू होणार आहे. पुणे जिल्हा ग्राहक मंचासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिरीक्त पुणे जिल्हा मंचाचे कामकाज असणार आहे.       कॅम्पमध्ये असलेल्या ग्राहक न्यायालयात एकूण दोन न्यायालय (मंच) आहेत. त्यातील एका न्यायालयात महापालिका हद्दीतील (पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंच) तर दुस-या न्यायालयात उर्वरीत जिल्ह्यातील (अतिरीक्त पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंच) दावे चालतात. तीन जणांचे बेंच असलेल्या या न्यायालयात १ अध्यक्ष व २ सदस्य असतात. त्यातील पुणे जिल्हा मंचाच्या अध्यक्षांची ३ तर अतिरीक्त  जिल्ह्यासाठी असलेल्या मंचाच्या अध्यक्षांची ५ महिन्यांहून अधिक काळ नियुक्ती केलेली नव्हती. त्यामुळे येथील कामकाज मंदावले असून तक्रारींवर निर्णयच होत नाही. या सर्वांचा ताण येथील उपलब्ध अधिकारी आणि कर्मचा-यांवरही येतो आहे. अतिरिक्त कामकाजाचा भार, अपु-या सुविधा अशा वातावरणात सुरू असलेल्या कामाचा फटका सर्वांनाच बसतो आहे. ग्राहक देवो भव:, ग्राहक राजा अशी उपमा ग्राहकांना देण्यात आली खरी, मात्र या ग्राहकांना फसवणुकीच्या विरोधात, मिळालेल्या सेवांच्या त्रुटींविरोधात दाद मागताना मात्र अनेक अडचणी येत आहेत. तसेच दर महिन्याच्या दुस-या आठवड्यात येणा-या राज्य ग्राहक आयोगाच्या सर्किट बेंचच्या कामकाजाबाबतही उदासीनता दिसून येत. जानेवारी महिन्यात बेंचचे कामकाज चालणार नसल्याची माहिती, कंज्युमर अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन पुणेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानराज संत यांनी दिली.     मंचाचे कामकाज पाहणारे अध्यक्ष कधी निवृत्त होणार आहेत, याची माहिती सरकारकडे आधीच असते. मात्र, अनेकांच्या निवृत्तीनंतरही रिक्त पदे वेळेत भरली न गेल्याचा अनुभव आहे. तक्रार दाखल केल्यापासून ३ महिन्यांत निकाल द्यावा, असे ग्राहक संरक्षण कायद्यात नमूद आहे. मात्र मंचात १ ते दिड वर्षांनी प्रकरण निकाली निघत आहे. तसेच दावा दाखल करण्यासाठी व तारीख मिळण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे ३ महिन्यांत प्रकरण निकाली लागतच नाही, असे अ‍ॅड. महेंद्र दलालकर यांनी सांगितले. 

जिल्हयातील प्रकरणे रेंगाळणार तब्बल ५ महिन्यांपासून कामकाज ठप्प असलेल्या अतिरीक्त जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज आता महिन्यातून एक आठवडा चालणार आहे. मात्र प्रकरणांच्या तुलनेत हा कालावधी कमी असल्याने दाखल दावे कासवगतीने चालणार आहे. त्यामुळे अतिरीक्त जिल्हा मंचासाठी स्वतंत्र अध्यक्षांची नियुक्ती करण्याची मागणी वकील करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय