शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: कोणाची इच्छा असली तरी संविधान बदलता येणार नाही; आम्ही ते बदलू देणार नाही - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:37 IST

चुकीची अर्थव्यवस्था आणि भ्रष्ट्राचारामुळे देशाचा सत्यानाश झालाय, काँग्रेसला अनेक गाेष्टी करता आल्या नाहीत

पुणे : काँग्रेसने जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले आहे. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण, संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले, चुकीची अर्थव्यवस्था आणि भ्रष्ट्राचारामुळे देशाचा सत्यानाश झाला आहे. काँग्रेसला अनेक गाेष्टी करता आल्या नाहीत. देशाचा विकास करण्यासाठी केवळ पैशाची गरज नाही, तर इमानदारी, योग्य नीती आणि नेतृत्व हवे. राज्यातील जनतेच्या भविष्याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचा विजय झाल्यास आपल्या राज्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट वेगाने धावणार, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.  पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ५४ हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत. आगामी काळात ५० हजार कोटींची कामे करून सुमारे १ लाख कोटींची कामे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

देश विश्वगुरू झाला पाहिजे

काँग्रेस काळात विविध कलमी घोषणा झाल्या, मात्र विकास कधीच झाला नाही. गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही. राज्यात सरकारी पैशातून विविध विकासकाम करणे शक्य नव्हते. मी मंत्री असताना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या उपक्रमातून विविध रस्त्याची कामे केली. देशात मोदी सरकारने नवीन आर्थिक धोरणं अवलंबत विकासाला गती दिली. आपली आटोमोबाईल इंडस्ट्री वेगाने विस्तारत असून, हिंदुस्थानचे महत्त्व जगात वाढत आहे. त्यासाठी भाजप काम करीत असून, हा देश विश्वगुरू झाला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. 

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ५४ हजार कोटींची कामे मंजूर

पुणे आणि पिंपरी चिंचवड विकासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाने तब्बल ५४ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहे. त्यानुसार रस्ते, बोगदे, विविध विकासकामे वेगाने वाढत आहेत. आता मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक जाम असते. अटल सेतूपासून काही अंतरावर नवीन मुंबई ते पुणे महामार्ग बांधत आहे. तो रिंगरोडला जोडला जाईल. या महामार्गासाठी ५५ हजार कोटींचा खर्च आहे. त्यामुळे मुंबई ते बंगलोर सहा तासांत अंतर कापले जाणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

सामाजिक समतेला प्राधान्य

भाजपचे कधीही जातीपातीचे काम केले नाही. सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण सर्वांनी एक झाले पाहिजे. संस्कृती आपली एकच असून, ती जगविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.

पुण्यातील प्रदूषणाबाबत चिंता वाटते

पुण्यात महर्षीनगरला माझी बहीण राहत होती. पर्वतीची हवा शुद्ध होती. पण, आता प्रदूषण वाढले असून, त्यांची चिंता वाटते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

व्यक्ती विकास, पायाभूत सुविधांकडे लक्ष

कोरोना कालावधीत मी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. राज्य सरकारमध्ये काम करताना कोल्हापूर अमरावती, कोथरूड अशा विविध ठिकाणी विकासकामे केली आहेत. विशेषतः कोथरूडमध्ये विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केले नाही. आगामी पाच वर्षांत पायाभूत सुविधा आणि व्यक्ती विकासाकडे लक्ष देणार आहे, असे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी