शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आजच्या काळात भारत वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वत:ची छाप निर्माण करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आजच्या काळात भारत वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वत:ची छाप निर्माण करत आहे. जगही त्याला मान्यता देऊ लागले आहे. अशा स्थितीत भारताचे यश कमी लेखण्याचा, भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान जाणीवपूर्वक रचले जात आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन मूठभर लोक भारताची प्रतिमा मलिन करीत आहेत. हा कट भारताच्या तरुणांनी हाणून पाडला पाहिजे,” अशी अपेक्षा राज्यपाल जगदीप धनखर यांनी व्यक्त केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे, महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या तीन पदविका अभ्यासक्रमांचे तसेच अटल लिट फेस्टिवल या उपक्रमाचे उद्घाटन राज्यपाल धनखर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. राज्यपालांच्या पत्नी सुधेश, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ परिषदेचे अध्यक्ष शरद कुंटे, महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. नितीन आपटे, उपाध्यक्ष महेश आठवले, सोसायटीचे सचिव धनजंय कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

“सन १९८९ मध्ये मी संसदेचा सदस्य होतो तेव्हा ५० गॅस कनेक्शन दिली तरी ते मोठे यश मानले जात होते. आता देशात तब्बल आठ कोटी सामान्यांच्या घरी गॅस पोहोचवण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे. हा फार मोठा बदल आहे. बँकिंग व्यवस्थेत अगदी छोट्या, शेवटच्या घटकाला स्थान मिळत आहे. तब्बल नऊ-दहा कोटी शेतकऱ्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारी योजनांचा थेट फायदा दिला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार केले जात आहे. केवळ घोकंपट्टीवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे हे धोरण आहे. सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करणारे बदल फार गतीने घडत आहेत,” असे प्रतिपादन धनखर यांनी केले.

मात्र, सर्व क्षेत्रांतल्या देशाच्या या घोडदौडीकडे दुर्लक्ष करुन नकारात्मकता माजवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न मूठभर लोक करत आहेत. भारताच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे, असे धनखर म्हणाले. “ भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या या संस्कृतीची मुळे मजबूत आहेत. भारतीय संविधानाचा आदर करत आपल्याला हिंसामुक्त समाज पुढे न्यायचा आहे. भारताच्या महान परंपरा, यश यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूठभर लोकांचा तरुणांनी ताकदीने मुकाबला केला पाहिजे,” असे आवाहन धनखर यांनी केले. ॲड. आपटे यांनी प्रास्ताविक केले. अनघा बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले. कुलकर्णी यांनी आभार मानले.