शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

आता बीए, बीकॉम साठी सुद्धा सीईटी? पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याचा विचार सुरू :उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 20:21 IST

सप्टेंबर मध्ये सुरू होणार कॉलेज तर जुलै मध्ये सीईटी

राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात बिएस्सी, बी.ए, सारख्या अभ्यासक्रमांना सीईटी घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या बरोबरच इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी जुलै अखेर पर्यंत होऊन सप्टेंबर पर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू होतील असे देखील त्यांनी सांगितले. 

पुण्यामध्ये आज सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान शैक्षणिक वर्ष कोरोना आटोक्यात येई पर्यंत ऑनलाइनच सुरू राहील असे ते म्हणाले. 

सामंत म्हणाले " कालच सीईटीच्या लोकांची बैठक झाली. प्रोफेशनल कोर्सेसला सीईटी नेहमी प्रमाणे पार पडेल.. इतर प्रवेशांसाठी वेगळा विचार करावा का याबाबत मतमतांतरं आहेत.. म्हणून बोर्डाचे निकाल आले की निर्णय घेतला जाईल. यासाठी व्हाईस चॅन्सलर्सची समिती नेमून निर्णय घेण्यात येणार आहे.सीईटीची परिक्षा केंद्र दुप्पट करणार आहोत. जुलै पर्यंत परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत"

 

दरम्यान महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारले असता,"जोपर्यंत कोव्हीड आटोक्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे योग्य होणार नाही." असं सामंत म्हणाले

 

 महाविद्यालयांच्या शुल्काबाबत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जितके दिवस कॅालेज बंद आहे त्यासाठी एफआरए समितीची मुदत संपली आहे.त्यासाठीची समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल. ती मंजूर झाली की तातडीने बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महाविद्यालयांच्या फी बाबत तक्रारी येतील त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्याच्या सुचना दिली असल्याचंही ते म्हणाले.शुल्क नियंत्रण समिती खासगी विद्यापीठांसाठी देखील करावी या मताचा मी देखील आहे असा दावा सामंत यांनी केला.

 

"सप्टेंबर मध्ये सगळे कॅालेज सुरु करण्याच्या मनस्थितीत आहोत.उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी प्लॅन तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाबाबत बोलताना "आरक्षणाबाबत सावध भुमिका कधीही घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची भुमिका आहे. जे गैरसमज पसरवतात त्यांचं कोण किती ऐकतात ते माहित नाही. संभाजराजेनी जी भूमिका मांडली आहे त्याचा विचार सरकार करते आहे. ते समाजाचं प्रतिनिधीत्व करतात" असे सामंत म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाUday Samantउदय सामंतcorona virusकोरोना वायरस बातम्याuniversityविद्यापीठ