शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आदिवासींच्या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे : डॉ. प्रकाश आमटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 19:41 IST

आदिवासींकडे शिक्षण, हक्कांची जाणीव नसल्याने पर्याय नव्हते.

ठळक मुद्देमाडिया शिकू या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : आदिवासींकडे शिक्षण, हक्कांची जाणीव नसल्याने पर्याय नव्हते. त्यामुळे वाईट परंपरा, अंधश्रध्दा त्यांच्यामध्ये रुजल्या होत्या. शहरात पर्याय असूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. शिक्षणाने आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दिली. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची संस्कृतीही टिकून राहिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ' माडिया शिकू'  या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सोमवारी घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखन मंजिरी परांजपे, ऋजुता टिळेकर, मैथिली देखणे-जोशी, ख्रिस्तीन फरायस यांनी केले आहे.   आदिवासींना शिक्षण देण्यासाठी बाबांनी प्रयत्न सुरू केले. बाबांच्या शाळेत अनेक स्वयंसेवक आपणहून रुजू झाले. ते गावोगावी फिरले, भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुले शाळेतून पळून जायची. दोन वर्षांनी हे प्रमाण कमी झाले. शहरी संस्कृतीचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ नये, अशी इच्छा होती. ४५ वर्षांत वाईट प्रथा कमी होत गेल्या. संस्कृती मात्र टिकून राहिली, याकडेही आमटे यांनी लक्ष वेधले.किरण कुलकर्णी म्हणाले, आदिवासी प्रवाह मुख्य प्रवाहात नेण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू आहे. मुख्य प्रवाहात आज गोंधळलेली अवस्था आहे. या अवस्थेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आदिवासी प्रवाहात नक्की सापडतात. शासकीय चौकटीच्या मयार्दा पाळून हे प्रवाह एकत्रित करण्याचे आव्हान पेलायचे होते. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करताना त्यांना मुख्य प्रवाहातील संधी मिळवून देणेही महत्वाचे आहे. संशोधनातून येणारी प्रगल्भता, अभ्यासातून येणारे भान आणि वर्तमानाची जाणीव यांचा समुच्चय संस्थेमध्ये आहेत.ह्णलेखिका मंजिरी परांजपे आणि मनीषा मज्जी या माडिया जमातीतील विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. सहआयुक्त नंदिनी आवाडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.विनीत पवार यांनी आभार मानले.----------------भारतात १० कोटी आदिवासी आहेत. ते जंगलाचे राजे होते. कायदे आले आणि जंगलाचा अधिकार वन विभागकडे गेला. त्यामुळे आदिवासी भरडले जाऊ लागले. त्यांना त्यांच्या अधिकारांची, हक्काची जाणीव नव्हती. त्यांना शिक्षण देण्यासाठी शासनाने शाळा सुरू केल्या. पण, आदिवासींची बोलीभाषा जाणणारे शिक्षक नव्हते. अन्यथा शिक्षणाचा स्तर उंचावला असता.- डॉ. प्रकाश आमटे

टॅग्स :Puneपुणे