शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिजोरदार पावसाच्या दिवसांत होतेय वाढ, १०० वर्षांच्या अभ्यासातून निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:40 IST

पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत

विवेक भुसेपुणे : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत असून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ होत आहे़ पावसाने सरासरी गाठली तरी, शेतीला ते नुकसानकारक व भूजलपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे़डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता आणि एलिझाबेथ साजी यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे़पावसाची प्रामुख्याने कोरडे दिवस, हलका पाऊस, मध्यम, जोरदार आणि अति जोरदार पाऊस अशी वर्गवारी केली जाते़ त्यात हलका आणि मध्यम पाऊस म्हणजे ६० मिमीपर्यंतचा पडलेला पाऊस गृहीत धरला जातो़ या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले़ ६० ते १२० मिमी पाऊस पडला तर त्याला जोरदार पाऊस म्हटले जाते़ यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही़ १२० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाला अतिजोरदार पाऊस म्हटले जाते़ कोकण किनारपट्टी भागात अशा अतिजोरदार पावसाचे प्रमाण जास्त आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अशा अति जोरदार पावसाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे़ धरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी या निष्कर्षाचा उपयोग करुन नियोजन केल्यास हानी टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ़ गुहाठाकुर्ता यांनी सांगितले़गेल्या शंभर वर्षांत...पाऊसमान वाढलेले जिल्हे : अहमदनगर, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ.पाऊसमान कमी झालेले जिल्हे : औरंगाबाद, बीड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड, वर्धा़