शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अतिजोरदार पावसाच्या दिवसांत होतेय वाढ, १०० वर्षांच्या अभ्यासातून निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:40 IST

पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत

विवेक भुसेपुणे : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत असून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ होत आहे़ पावसाने सरासरी गाठली तरी, शेतीला ते नुकसानकारक व भूजलपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे़डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता आणि एलिझाबेथ साजी यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे़पावसाची प्रामुख्याने कोरडे दिवस, हलका पाऊस, मध्यम, जोरदार आणि अति जोरदार पाऊस अशी वर्गवारी केली जाते़ त्यात हलका आणि मध्यम पाऊस म्हणजे ६० मिमीपर्यंतचा पडलेला पाऊस गृहीत धरला जातो़ या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले़ ६० ते १२० मिमी पाऊस पडला तर त्याला जोरदार पाऊस म्हटले जाते़ यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही़ १२० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाला अतिजोरदार पाऊस म्हटले जाते़ कोकण किनारपट्टी भागात अशा अतिजोरदार पावसाचे प्रमाण जास्त आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अशा अति जोरदार पावसाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे़ धरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी या निष्कर्षाचा उपयोग करुन नियोजन केल्यास हानी टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ़ गुहाठाकुर्ता यांनी सांगितले़गेल्या शंभर वर्षांत...पाऊसमान वाढलेले जिल्हे : अहमदनगर, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ.पाऊसमान कमी झालेले जिल्हे : औरंगाबाद, बीड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड, वर्धा़