शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अतिजोरदार पावसाच्या दिवसांत होतेय वाढ, १०० वर्षांच्या अभ्यासातून निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:40 IST

पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत

विवेक भुसेपुणे : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत असून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ होत आहे़ पावसाने सरासरी गाठली तरी, शेतीला ते नुकसानकारक व भूजलपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे़डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता आणि एलिझाबेथ साजी यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे़पावसाची प्रामुख्याने कोरडे दिवस, हलका पाऊस, मध्यम, जोरदार आणि अति जोरदार पाऊस अशी वर्गवारी केली जाते़ त्यात हलका आणि मध्यम पाऊस म्हणजे ६० मिमीपर्यंतचा पडलेला पाऊस गृहीत धरला जातो़ या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले़ ६० ते १२० मिमी पाऊस पडला तर त्याला जोरदार पाऊस म्हटले जाते़ यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही़ १२० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाला अतिजोरदार पाऊस म्हटले जाते़ कोकण किनारपट्टी भागात अशा अतिजोरदार पावसाचे प्रमाण जास्त आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अशा अति जोरदार पावसाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे़ धरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी या निष्कर्षाचा उपयोग करुन नियोजन केल्यास हानी टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ़ गुहाठाकुर्ता यांनी सांगितले़गेल्या शंभर वर्षांत...पाऊसमान वाढलेले जिल्हे : अहमदनगर, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ.पाऊसमान कमी झालेले जिल्हे : औरंगाबाद, बीड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड, वर्धा़