शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:30 IST

यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या.

पुणे : यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा आम्ही दुप्पट करू, असा दावा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात शनिवारी ते बोलत होते. साम-दाम-दंड आणि भेदाचा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेत आहे. कर्नाटक आणि गोवा विधानसभेत त्यांनी असेच केले. भाजपचे हे वर्तन लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशी टीकाही थोरात यांनी केली.काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल विचारले असता थोरात म्हणाले, अनेक नेत्यांच्या विविध प्रकारच्या संस्था आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी ते भाजपकडे जात आहेत. एखाद्या पक्षाशी निष्ठा जपत असताना असे वर्तन होता कामा नये. हे लोकशाहीला धरुन नाही. भाजपदेखील साम-दाम-दंडचा उपयोग करुन विरोधी नेत्यांना फोडत आहे.आजचा काळ पक्षासाठी कठीण असला तरी, ही स्थिती पहिल्यांदा आली नाही. अगदी इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या. तसेच, १९९९ साली काँग्रेस फुटल्यानंतर देखील असेच वातावरण होते. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकारच आले, असे थोरात म्हणाले. आम्ही सर्व आव्हाने पेलून यश मिळवू. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. समाजमाध्यमे आणि काळाला अनुसरुन असलेल्या आयुधांचा वापर आम्ही निश्चित करु, असे त्यांनी स्पष्ट केले.मनसेबाबत अद्याप निर्णय नाहीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीसोबत घेण्यासंदर्भात राज्यात अथवा केंद्रीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शक्य तिथे तरुण आणि महिलांना संधी दिली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस