शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:30 IST

यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या.

पुणे : यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा आम्ही दुप्पट करू, असा दावा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात शनिवारी ते बोलत होते. साम-दाम-दंड आणि भेदाचा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेत आहे. कर्नाटक आणि गोवा विधानसभेत त्यांनी असेच केले. भाजपचे हे वर्तन लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशी टीकाही थोरात यांनी केली.काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल विचारले असता थोरात म्हणाले, अनेक नेत्यांच्या विविध प्रकारच्या संस्था आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी ते भाजपकडे जात आहेत. एखाद्या पक्षाशी निष्ठा जपत असताना असे वर्तन होता कामा नये. हे लोकशाहीला धरुन नाही. भाजपदेखील साम-दाम-दंडचा उपयोग करुन विरोधी नेत्यांना फोडत आहे.आजचा काळ पक्षासाठी कठीण असला तरी, ही स्थिती पहिल्यांदा आली नाही. अगदी इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या. तसेच, १९९९ साली काँग्रेस फुटल्यानंतर देखील असेच वातावरण होते. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकारच आले, असे थोरात म्हणाले. आम्ही सर्व आव्हाने पेलून यश मिळवू. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. समाजमाध्यमे आणि काळाला अनुसरुन असलेल्या आयुधांचा वापर आम्ही निश्चित करु, असे त्यांनी स्पष्ट केले.मनसेबाबत अद्याप निर्णय नाहीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीसोबत घेण्यासंदर्भात राज्यात अथवा केंद्रीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शक्य तिथे तरुण आणि महिलांना संधी दिली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस