शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस हा विचार असून ताे कधीही मरणार नाही : बी. जे. खताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:10 IST

महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री असलेले विजय खताळ हे येत्या 26 मार्चला अापल्या वयाची शंभरी पार करत अाहेत. खताळ हे दीर्धकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय हाेते. त्यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकाॅंग्रेस हा गांधीजींनी दिलेला विचारगांधी कुटुंबावरील घराणेशाहीचा अाराेप चुकीचा

पुणे : काँग्रेस ही केवळ एक संघटना नसून तो एक विचार आहे. आणि तो महात्मा गांधीनी दिलेला विचार आहे. त्यामुळे काँग्रेस हा विचार कधीही मरणार नाही, असे मत महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री बी.जे.खताळ यांनी व्यक्त केले.     श्री आदीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने शनिवार पेठेतील साधना मिडिया सेंटर येथे खताळ यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, खताळ यांचे पुतणे संतोष खताळ आदी उपस्थित होते.     चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पहिल्या मंत्रीमंडळाची स्थापना, विविध मुख्यमंत्र्यांबरोबरचे अनुभव, निर्णय घेताना पाळलेली तत्त्वनिष्ठा, गांधी घराण्याची परंपरा, राजकारणाची सद्यस्थिती, सक्रिय राजकारणापासून दूर जात जगत असलेले आनंदी आणि समाधानी जीवन, आरोग्यसंपन्न शरीरयष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवर खताळ यांनी आपल्या कडक शिस्तीच्या शैलीत परखड उत्त्तरे दिली.    खताळ म्हणाले, राजकारणात येण्याआधी राजकारण कश्यासाठी करायचे हे ठरवायला हवे. त्याग हा राजकारणाचा पाया आहे. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण हे माझे आवडते मुख्यमंत्री होते. सरकार कसे चालवायला हवे याचे योग्य ज्ञान असलेली ही दोन व्यक्तिमत्वे होती. काँग्रसमधील घराणेशाही बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, लोकांनी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना  लोकांनी स्विकारलं होतं. अलीकडे राहुल गांधीनाही लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येणार नाही.     ए. आर. अंतुले यांचे सरकार पडल्याची आठवण सांगताना खताळ म्हणले, सत्ता मिळाल्यावर काहीही करता येते, असे अंतुलेंना वाटत होते. त्यामुळे अंतुलेंच्या सरकारला त्याकाळी पायऊतार व्हावे लागले होते. राजकारणाचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला, तर जनतेच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. सरकार जनतेचे असते. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे आपण हवे ते करु शकू, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करायला हवे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण