शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

काॅंग्रेस हा विचार असून ताे कधीही मरणार नाही : बी. जे. खताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:10 IST

महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री असलेले विजय खताळ हे येत्या 26 मार्चला अापल्या वयाची शंभरी पार करत अाहेत. खताळ हे दीर्धकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय हाेते. त्यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकाॅंग्रेस हा गांधीजींनी दिलेला विचारगांधी कुटुंबावरील घराणेशाहीचा अाराेप चुकीचा

पुणे : काँग्रेस ही केवळ एक संघटना नसून तो एक विचार आहे. आणि तो महात्मा गांधीनी दिलेला विचार आहे. त्यामुळे काँग्रेस हा विचार कधीही मरणार नाही, असे मत महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री बी.जे.खताळ यांनी व्यक्त केले.     श्री आदीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने शनिवार पेठेतील साधना मिडिया सेंटर येथे खताळ यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, खताळ यांचे पुतणे संतोष खताळ आदी उपस्थित होते.     चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पहिल्या मंत्रीमंडळाची स्थापना, विविध मुख्यमंत्र्यांबरोबरचे अनुभव, निर्णय घेताना पाळलेली तत्त्वनिष्ठा, गांधी घराण्याची परंपरा, राजकारणाची सद्यस्थिती, सक्रिय राजकारणापासून दूर जात जगत असलेले आनंदी आणि समाधानी जीवन, आरोग्यसंपन्न शरीरयष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवर खताळ यांनी आपल्या कडक शिस्तीच्या शैलीत परखड उत्त्तरे दिली.    खताळ म्हणाले, राजकारणात येण्याआधी राजकारण कश्यासाठी करायचे हे ठरवायला हवे. त्याग हा राजकारणाचा पाया आहे. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण हे माझे आवडते मुख्यमंत्री होते. सरकार कसे चालवायला हवे याचे योग्य ज्ञान असलेली ही दोन व्यक्तिमत्वे होती. काँग्रसमधील घराणेशाही बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, लोकांनी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना  लोकांनी स्विकारलं होतं. अलीकडे राहुल गांधीनाही लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येणार नाही.     ए. आर. अंतुले यांचे सरकार पडल्याची आठवण सांगताना खताळ म्हणले, सत्ता मिळाल्यावर काहीही करता येते, असे अंतुलेंना वाटत होते. त्यामुळे अंतुलेंच्या सरकारला त्याकाळी पायऊतार व्हावे लागले होते. राजकारणाचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला, तर जनतेच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. सरकार जनतेचे असते. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे आपण हवे ते करु शकू, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करायला हवे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण