शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

निवडणूकीतील पराभवामुळे राहुल गांधी अस्वस्थ; त्यांना देशात काहीच चांगले दिसत नाही- अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 21:50 IST

शहरात एका कार्यक्रमानिमित्त भाजप कार्यालयात अगुराग ठाकूर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुणे : राहूल गांधी यांना देशात काहीच चांगले दिसत नाही व मतदार सांभाळण्यासाठी ते विदेशात जावून देशावर टीका करत आहेत. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पुण्यात केली. शहरात एका कार्यक्रमानिमित्त भाजप कार्यालयात अगुराग ठाकूर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, गणेश घोष, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, राघवेंद्र मानकर, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

ठाकुर म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वामध्ये बदल झाला, तरी अधिकार मात्र कुटुंबाकडेच आहेत. पक्ष कार्यालयातही एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचे छायाचित्र लावण्यात आले आहे. काँग्रेस म्हणजे एक परिवार आहे. राहूल गांधी यांचे पक्षामध्ये कोणी ऐकत नाही म्हणून ते परदेशात जाऊन केंद्र सरकार व भारताची बदनामी करत आहेत. सैनिकांबद्दल राजस्तानमध्ये त्यांनी काढलेले उद्गार, पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी लष्कराविषयी केलेले भाष्य यातून लष्कराचे खच्चीकरण करण्याचेच त्यांचे प्रयत्न दिसतात.

सिसाेदियांच्या अटक पण खरा सुत्रधार केजरीवाल

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांना अटक झाली असली तरी त्यामागचा खरा सूत्रधार अरविंद केजरीवाल आहे. दारुवरचे कमिशन चार टक्क्यांवरून १२ टक्के करण्यासाठी जनादेश मिळाला होता का? दिल्लीतील चौकशीत पुन्हा पुन्हा ‘व्ही’ हे नाव समोर येत आहे. व्ही हे कोणाचे नाव आहे. या नावाचे दिल्ली सरकारमध्ये महत्त्व का वाढले आहेही असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.

तपास यंत्रणेवर बिनबुडाचे आराेप

तेलंगणा निर्माण झाले तेव्हा या राज्याची परिस्थिती काय होती. आज परिस्थिती काय आहे. बिहारमध्ये भ्रष्टाचाराने उच्चांक गाठल्यानंतर तपास यंत्रेणेने तपास कार्याला सुरूवात केली आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्याऐवजी यंत्रणेचा बिहार आणि तेलंगणात वाईट प्रचार केला जात आहे. भ्रष्टाचार केला नसेल, तर भिती कसली. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरPuneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी