शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

जनतेच्या पैशाला काळा पैसा म्हटले, काँग्रेस करेल नोटाबंदीची चौकशी : आनंद शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 06:14 IST

नरेंद्र मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, की ज्यांनी जनतेच्या पैशाला काळा पैसा असा म्हटले. नोटाबंदी हा एक महाघोटाळा आहे. काँग्रेस आज ना उद्या सत्तेवर येणारच आहे. त्या सरकारचे पहिले काम या महाघोटाळ्याची चौकशी करणे हेच असेल

पुणे : नरेंद्र मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, की ज्यांनी जनतेच्या पैशाला काळा पैसा असा म्हटले. नोटाबंदी हा एक महाघोटाळा आहे. काँग्रेस आज ना उद्या सत्तेवर येणारच आहे. त्या सरकारचे पहिले काम या महाघोटाळ्याची चौकशी करणे हेच असेल, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर टीका केली.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगरावकदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस,आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार तसेच अभय छाजेड, माजी खासदार अशोक मोहोळ, कमल व्यवहारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप आदी या वेळी उपस्थित होते.शर्मा म्हणाले, या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे. नोटाबंदीमुळे बँकेत जमा झालेला सर्व पैसा काळा पैसा होता का? किती काळा पैसा जमा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते अजूनही देत नाहीत. त्यांच्या या एका निर्णयामुळे देशातील अनेक उद्योग मोडकळीस आले. ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या नोकºया गेल्या. अनेकांना त्याचा फटका बसला. सामान्यांचे हाल झाले ते वेगळेच! आमचे सरकार आले की या सर्व प्रकाराची आम्ही चौकशी करूच करू.प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. सत्तेवर आल्यापासून या सरकारने शेतकºयांना त्रास देण्याचे काम केले आहे. त्यांच्या धोरणांमुळे शेतकºयांना रस्त्यावर उतरणे भाग पडते आहे. मागील वेळी त्यांना लाठीमार केला, आता तर गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशा वेळी इंदिराजी गांधी यांच्यासारख्या नेत्या हव्या होत्या. प्रदेश काँग्रेस त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रव्यापी यात्रा काढणार आहे. त्यात या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाबाबत जनजागृती करण्यात येईल. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली.सुरेश कलमाडी यांची भेटया कार्यक्रमाला येण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून कलमाडी काँग्रेसपासून बरेच दूर आहेत. ते आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली असल्याचीमाहिती मिळाली.जिल्हा व शहर काँग्रेस यांच्यातील वादाचे प्रत्यंतर या कार्यक्रमात आले. शहरातील पदाधिकाºयांना तसेच ज्येष्ठ नेत्यांना या कार्यक्रमाच्याप्रसिद्धीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे बरेचसे पदाधिकारी प्रमुख नेत्यांची भाषणे झाल्यानंतर सभागृहातून निघून गेले. त्याची चर्चासभागृहातच सुरू होती.

टॅग्स :Note Banनोटाबंदीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी